AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Protest : मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंग, शिवसेनेनं अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पेटवल्या मेणबत्या

शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायकवाड, चैनू जाधव, राहुल पाटील, युवराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र यावेळी पाटील यांच्या दालनातील लाईट, एसी, पंखे बंद करून त्यांच्याशी अंधारात चर्चा करण्यात आली.

Kalyan Protest : मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंग, शिवसेनेनं अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पेटवल्या मेणबत्या
मलंगगड परिसरात महावितरणचं अघोषित लोडशेडिंगImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 24, 2022 | 12:14 AM
Share

कल्याण : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अघोषित लोडशेडिंग (Load Shedding) सुरू करण्यात आलं आहे. याविरोधात शनिवारी शिवसेनेनं कल्याणच्या तेजश्री या महावितरण कार्यालयावर मोर्चा (Morcha) काढला. शिवसेनेच्या नेतृत्त्वात निघालेल्या या मोर्चात मलंगगड परिसरातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. तर महिलांनीही मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. शिवसेनेचे स्थानिक नेते महेश गायकवाड, चैनू जाधव, राहुल पाटील, युवराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र यावेळी पाटील यांच्या दालनातील लाईट, एसी, पंखे बंद करून त्यांच्याशी अंधारात चर्चा करण्यात आली. तसंच त्यांना लोडशेडिंगच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या दालनात शिवसेनेनं मेणबत्त्या पेटवत लोडशेडिंगचा प्रतिकात्मक निषेध केला. (Shiv Sena agitation against load shedding in Kalyan Malanggad area)

यानंतर जर रात्रीची अघोषित लोडशेडिंग बंद झाली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी दिला. तर लोडशेडिंग बंद न झाल्यास महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना एक रात्र मलंगगड भागात मुक्कामाला घेऊन जाऊ, असा इशारा चैनू जाधव यांनी दिला.

लोडशेडिंगविरोधातील मोर्चावर भाजप आमदारांची टीका

हा मोर्चा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री किंवा अजितदादांच्या बंगल्यावर मोर्चा काढावा, असा खोचक टोला कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी लगावलाय. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच सरकारच्या विरोधात मोर्चा काढतात, त्यामुळं आपलं सरकार काही काम करत नाही हे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही समजलं आहे, अशी टीका गणपत गायकवाड यांनी यावेळी केली. तसंच 2014 पूर्वी केंद्रात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना लोडशेडिंग होत होती, पण 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर लोडशेडिंग बंद झालं, असंही गायकवाड म्हणाले. (Shiv Sena agitation against load shedding in Kalyan Malanggad area)

इतर बातम्या

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.