AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरातीत नाचण्याची हौस भारी पडली, नाचता नाचता थेट रुग्णालयात पोहचले, काय घडलं नेमकं?

हॉटेलमध्ये एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नासाठी नवरदेव वरात घेऊन लग्नस्थळी दाखल झाला. हॉटेलच्या पार्किंगमध्ये वऱ्हाडी नाचत होते. पण अचानक या उत्साहावर पाणी फेरले.

वरातीत नाचण्याची हौस भारी पडली, नाचता नाचता थेट रुग्णालयात पोहचले, काय घडलं नेमकं?
गाडीवरील नियंत्रण सुटल्याने 12 वऱ्हाड्यांना चिरडलेImage Credit source: TV9
| Updated on: May 09, 2023 | 3:41 PM
Share

निनाद करमरकर, TV9 मराठी, उल्हासनगर : लग्नाच्या वरातीत नाचण्याची हौस काही वऱ्हाड्यांना चांगलीच महागात पडली आहे. उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवरदेवाच्या कारने 12 वऱ्हाड्यांना चिरडल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात घडली आहे. जखमींपैकी 8 जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले, तर तिघांवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर गाडी जप्त केली असून चालकालाही अटक केली आहे.

ऑटोमॅटिक कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात

रोहित धरमपाल रिझवानी याचे उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरातील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सोमवारी सायंकाळी लग्न होते. या लग्नाचं वऱ्हाड हॉटेलजवळ आले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये वऱ्हाडी नाचत होते. यावेळी पुढे वऱ्हाडी नाचत होते, तर नवरदेव मागे थार गाडीत बसला होता. यादरम्यान नवरदेवाच्या थार गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार थेट वऱ्हाड्यांच्या अंगावर आली. यामध्ये 12 वऱ्हाडी चिरडले गेले. या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे 8 जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आलं. तर तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला मुंबईला हलवण्यात आलंय.

कार ऑटोमॅटिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

ज्या कारने वऱ्हाड्यांना चिरडलं, ती थार गाडी ऑटोमॅटिक असल्यानं चालकाचं नियंत्रण सुटले आणि दुर्दैवी ही घटना घडली. या घटनेमुळे ऐन लग्न समारंभात शोककळा पसरली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत गाडी जप्त केली असून, चालकालाही अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.