AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं… अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान

ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आभाळ फाटलं. अवकाळी पावसाने आंबा आणि द्राक्ष बागांचं मोठं नुकसान. हवामान खात्याकडून पुढील 24 तासांसाठी अलर्ट जारी.

ऐन उन्हाळ्यात आभाळच फाटलं... अवकाळीच्या दणक्याने द्राक्षांपासून आंब्यांपर्यत नुकसानच नुकसान
| Updated on: Jan 27, 2026 | 11:47 AM
Share

Weather Update :  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याचं समोर आलंं. नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. शहादा शहरासह परिसरात अचानक जोरदार पावसाची बॅटिंग झाली असून जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या. सोमवारी रात्री झालेल्या या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात सापडला असून, रब्बी हंगामातील पिकांचे संपूर्ण गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पपई, गहू आणि हरभरा या पिकांना सर्वाधिक धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पिके पाण्यात भिजल्याने खराब होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

आंबा आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान

दरम्यान, सातपुडा पट्ट्यातील आंबा आणि कैरी उत्पादक शेतकरीही मोठ्या संकटात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी मोहरांनी बहरलेली आंब्याची झाडे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर मोहर गळून जमिनीवर पडल्याचे दिसून आले आहे. आंब्याचा मोहर गळून पडल्यास यंदा आंबा आणि कैरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असून याचा थेट फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

याशिवाय, गेल्या पावसाळ्यात तब्बल सहा महिने सतत पडलेला पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे 50 ते 60 टक्क्यांहून अधिक द्राक्ष बागा बाधित झाल्याचे चित्र आहे. त्यातच सध्या जाणवणारी थंडी आणि गेल्या महिन्याभरापासून कायम असलेले ढगाळ वातावरण यामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ठाण्यात पावसाच्या सरी

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्ते ओले चिंब झाले असून हवेत गारवा वाढला आहे. या पावसामुळे वातावरणात अचानक बदल जाणवू लागला आहे. हवामान खात्याने याआधीच ठाणे आणि परिसरात पावसाचा इशारा दिला होता.

दरम्यान, हवामान खात्याने यापूर्वीच विविध भागांत पाऊस पडण्याचा इशारा दिला होता. जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल होत असून गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.

Follow Us
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी सांगितली 2024 मधील ती गोष्ट
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
Sanjay Raut | कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा वाजवत बसतील; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
Omraje Nimbalkar | 20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज मोठा निकाल; ओमराजे मुंबईच्या दिशेने रवाना
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
मोठी बातमी! अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?, फोटोमधून झाला खुलासा
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल