AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘पाच मिनिटात बॉडी गायब होते’, संजय राऊतांचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा गौप्यस्फोट, गडचिरोलीत नेमकं काय घडतय?

Sanjay Raut : "सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला तर आई-वडिलांना खांद्यावर टाकून ते प्रेत घरापर्यंत न्यावं लागतं. हे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे आहेत. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस कसल्या विकासाच्या गोष्टी करताय तुम्ही, कोणाला मूर्ख बनवता?" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : 'पाच मिनिटात बॉडी गायब होते', संजय राऊतांचा महाराष्ट्राला हादरवून सोडणारा गौप्यस्फोट, गडचिरोलीत नेमकं काय घडतय?
Sanjay Raut
| Updated on: Aug 11, 2026 | 12:24 PM
Share

गडचिरोली जिल्ह्यातील आश्रम शाळेत काल तीन मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला. तीन मुलींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याच मुद्यावरुन आज खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. सर्पदंशाने विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूवर बोलताना संजय राऊत यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. “भाजपचे जे मोठे देणगीदार आहेत, त्यांनी गडचिरोलीतली जंगलं तोडली. गडचिरोलीतल्या नद्या प्रदूषित केल्या, डोंगर तोडले, त्यामुळे जल, जमीन, जंगल ही आदिवासींची जी घोषणा होती, आम्ही याचे मालक आहोत, तो आदिवासी विस्थापित झाला. डोंगरावरचे वाघ, बिबटे, जंगली प्राणी, साप हे आदिवासींच्या शाळांमध्ये, घरांमध्ये घुसून आदिवासींचे बळी घेतायत. तुम्ही गडचिरोलीतला नक्षलवाद संपवला म्हणता म्हणून आदिवासींचे मृत्यू थांबलेले नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला. “गडचिरोलीचा कसला विकास करताय तुम्ही, आदिवासींना उपचार मिळत नाहीत आणि गडचिरोलीला स्टील सिटी करायला निघालेत. तीन विद्यार्थीनीच्या मृत्यूवर राज्य सरकार हळहळत नसेल, तर या सारखं निदर्यी सरकार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“या राज्यातल्या सरकारी शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा यांची अवस्था बघा. मी आश्रम शाळेविषयी बोलतोय. काय मिळतं तुमच्या विकासामुळे?. गडचिरोलीतला खाण उद्योग आहे, हजारो, लाखो वाहनं चालतात. आतापर्यंत 150 आदिवासी त्या वाहनाखाली चिरडून मेलेत. एफआयआर नको म्हणून त्यांचे मृतदेह गायब केले जातात. रक्ताचं थारोळं साचतं. एखाद्या आदिवासीची बॉडी पाच मिनिटात हलवली जाते. पाण्याचे फवारे मारुन लगेच रक्त साफ केलं जातं. असे आतापर्यंत 1500 लोक मेलेत” असा हादरवून सोडणारा गौफ्यस्फोट संजय राऊत यांनी केला.

मला सांगा यासाठी विकास हवाय का तुम्हाला?

“दीड ते एक वर्षातला आकडा आहे. खाण मालकाच्या दबावाखाली जिल्ह्याचा कलेक्टर याची कुठली नोंद ठेवत नाही. 1500 लोक मेलेत. मुख्यमंत्री काय करतायत? आदिवासी विकास मंत्री काय करतायत? मला सांगा यासाठी विकास हवाय का तुम्हाला? आदिवासींना काय मिळतय? विस्थापित केलय तुम्ही, कसला रोजगार आणताय? किती रोजगार मिळालाय तिथे? भाजपने त्यांच्या देणगीदारांना गडचिरोलीतली जंगलं, नद्या उद्धवस्त करायला दिलेत. ज्या तीन मुलींचा मृत्यू झाला तो रेकॉर्डवर आहे” असं राऊत म्हणाले.

फडणवीस कसल्या विकासाच्या गोष्टी करताय तुम्ही

“आश्रम शाळांना निधी दिला जातो, कुठे जातो तो, कोण खातं, कोणाचे लोक आहेत?” असे प्रश्न राऊतांनी विचारले. “ही सर्पदंशाची घटना समोर आली. पण आतापर्यंत असंख्या मुलं-मुली, विंचू, साप चावल्याने मरण पावली आहेत. आदिवासी पाड्यांवर रुग्णवाहिका नाहीत. झोळीतून रुग्णांना, प्रेत न्यावी लागतायत” या भीषण वास्तवाकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.

Follow Us
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा