AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve : साटम-झाटम विकासावर बोला, अंबादास दानवेंची जीभ घसरली

Ambadas Danve : "भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे"

Ambadas Danve : साटम-झाटम विकासावर बोला, अंबादास दानवेंची जीभ घसरली
Ambadas Danve
| Edited By: | Updated on: Jan 09, 2026 | 12:49 PM
Share

“हा फेक शो होता, नॉट टॉक शो तारीख पे तारीख दिली आहे. काल गुपचूप पंप हाऊसचं उद्घाटन झालं, पण काहीही झालेलं नाही. मी माहिती घेतली आहे. पुणे, नागपूर शो देखील पाहिले. सर्व सारखेच होते, प्रश्न विचारणारे त्यांचेच होते” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “3 लाख कोटी मुंबई महानगरपालिकेला देणे आहे, फडणवीस-शिंदे यांनी मुंबईला लुटले आहे. 93 हजार कोटींची डिपॉझिट देखील तोडली आहे, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील” असं अंबादास दानवे यांनी सांगितलं. “आम्ही आधी 50 खोके घोषणा देत होते, आता भाजप देत आहे. परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. एमआयएम देखील सोबत आहे” अशी टीका दानवे यांनी केली.

“भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगव्याची शान आहे. भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं? भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे” असं अंबादास दानवे म्हणाले. “मला असे वाटते की विकासावर बोलले पाहिजे. अशा गोष्टींना अर्थ नाही, लोकांच्या मनातलं विश्लेषण आम्हाला मान्य नाही, निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिले जातात, रिकाम्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं पाहिजे” असं दानवे म्हणाले.

भाजप सांगण्यात पटाईत

“खोटारडेपणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे, भाजप सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा करतात. “हे असत्य आहे उदय सामंत यांनी सांगावे, वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले यावर सामंत यांनी बोलावे” असं दानवे म्हणाले.

साटम-झाटम विकासावर बोला

“रावसाहेब दानवे यांनी काहीही काम केलं नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले. दानवेंना चकवा म्हटलं जातं, दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. “नितेश राणे विकासावर बोला. यांची जी पिलावळ आहे राणे, साटम, झाटम, विकासावर बोला” असं अंबादास दानवे म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत