AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा

काही दिवसांपूर्वी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं होतं, त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे, फडणवीसांची दिलजमाई? महायुतीमधील केंद्रीय मंत्र्याचा दावा
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
| Updated on: Oct 27, 2024 | 6:00 PM
Share

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागा वाटप जवळपास निश्चित झालं आहे, महायुतीमधील तीन प्रमुख घटक पक्ष भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं अनेक विधानसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारांची देखील घोषणा केली आहे. मात्र महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयला या विधानसभा निवडणुकीत एकही मतदारसंघ सोडण्यात आलेला नाही, यावरून रामदास आठवले चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

नेमकं काय म्हटलं आठवले यांनी?

‘मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, छोटा जरी पक्ष असला तरी जागा हव्या होत्या.  मागे फडणवीसांना पत्र दिले होते, किमान 5 जागा द्या अशी मागणी होती. जागा मिळाल्या नाहीत त्यामुळे नॉमिनेशनसाठी जाणार नसल्याचं कार्यकर्ते म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आलो. आज आरपीआय कुठेच दिसत नाही. मी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह होता. महामंडळाची देखील मागणी केली आहे. जिल्हा परिषद, महापालिकेसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. आरपीआयला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. मी महायुतीच्या बाजूनं आहे. मी केंद्रात मंत्री असल्यानं इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो.

त्यामुळे आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय, आम्ही सातत्यानं महायुतीसोबत आहोत. पण जागा मिळाल्या नाहीत. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती. अनेक जागा हव्या होत्या. आम्ही चार ते पाच जागांची अपेक्षा ठेवली होती. मात्र आम्हाला जागा मिळाल्या नाहीत. मी फडणवीसांना पत्र लिहीलं आहे, त्यात मागण्या केल्या आहेत. आम्हाला एक एमएलसी देखील हवी आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्ष तुम्हाला मजबूत करण्याऐवजी खिळाखिळा करत आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं, उद्धव ठाकरे हे महायुती सोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटलेच नसते. देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?