AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील जागांचा तिढा पोहचला दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड घेणार काँग्रेस हायकमांडची भेट

मुंबईतील जागांवरुन अजूनही महाविकासआघाडीत तिढा कायम आहे. काँग्रेसला मिळालेल्या जागांवरुन वर्षा गायकवाड नाराज आहेत. त्यातच मिळालेल्या दोन जागांपैकी एका जागेवर ठाकरे गटाकडून दावा केला जात असल्याने वर्षा गायकवाड थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांड यांची भेट घेण्यासाठी गेल्या आहेत.

मुंबईतील जागांचा तिढा पोहचला दिल्लीत, नाराज वर्षा गायकवाड घेणार काँग्रेस हायकमांडची भेट
वर्षा गायकवाड
| Updated on: Apr 13, 2024 | 5:04 PM
Share

महाविकासआघाडीत मुंबईतील जागांवरुन तिढा सुरु असताना वर्षा गायकवाड थेट दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. त्यांच्यासोबत अमिन पटेल आणि अस्लम शेख हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. याआधी सांगली आणि भिवंडीचा तिढा होता. पण तो नंतर सुटला. पण असं असलं तरी अजून काही जागांवरुन तिढा कायम आहे.

मुंबईतील जागांवरुन तिढा

मुंबईतील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तिढा आहे. मुंबईत काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत त्यामुळे वर्षा गायकवाड नाराज आहेत. काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा आम्हाला मिळाली तर आम्ही विजय मिळवून दाखवू असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईत ठाकरे गटाला ४ जागा तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. ज्यामध्ये मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं अद्याप आपला उमेदवार दिलेला नाहीये.

मुंबईत काँग्रेसला दोन जागा

काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी उत्तर मुंबईची जागा मिळाण्यासाठी ठाकरे गटाचा प्रयत्न सुरु आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील हायकमांडसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यामुळे त्या आज दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

उत्तर मुंबईतून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण पियूष गोयलांविरोधात काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार नसल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. त्यामुळे येथे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.