AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाज्यांचे दर वाढले, अंडी महागली.. महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका

भेंडी, कोबी, गवार, हिरवे वाटाणे, कारलं, वांगी, बटाटे यांसारख्या भाज्यांचे दर वाढले आहेत. तर स्वयंपाकासाठी आवश्यक असलेले लसूण आणि आले यांच्या किमतीही वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

भाज्यांचे दर वाढले, अंडी महागली.. महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा झटका
भाज्यांचे दर वाढलेImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 21, 2026 | 9:49 AM
Share

‘एल निनो’मुळे यावर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एल निनो सक्रिय झाल्यामुळे देशातल्या अनेक भागांमधील पाऊस दूर पळाला आहे. उशिरा आलेला मान्सून आणि उष्णता यांमुळे अंडी आणि भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही आठवड्यांपर्यंत 74 ते 80 रुपयांपर्यंत अंड्यांचे दर घसरल्यानंतर आता पुन्हा भाव वाढले आहेत. अंड्यांचे दर सध्या 90 ते 96 रुपये प्रति डझनपर्यंत वाढले आहेत. मुंबईत काही ठिकाणी अंडी 96 रुपये प्रति डझन दराने विकली जात आहेत. कडक उन्हाळ्यामुळे उत्पादन घटलं आहे, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे.

भाज्यांचे दर वाढले

  • कोबी, घेवडा, भेंडी आणि दुधी भोपळा यांचे दर 100 ते 120 रुपये प्रति किलो आहेत.
  • गवार, दुधी भोपळा, हिरवे वाटाणे आणि घेवडा 160 ते 200 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत.
  • टोमॅटो 60 रुपये किले, कोथिंबीर 30 रुपये प्रति जुडी, पुदिना 20 रुपये आणि मेथी 25 रुपये प्रति जुडीने मिळत आहे.
  • कारलं, पडवळ, वांगी आणि बटाट्यांच्या दरात प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे.
  • स्वयंपाकातील अत्यावश्यक घटक असलेल्या लसूण आणि आल्याच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत.

दुसरीकडे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलमधील तयार जेवणाचाही खर्च वाढला आहे. भाजीपाल्याच्या दरात हळूहळू होणाऱ्या वाढीमुळे घरखर्च चालवणंही सर्वसामान्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. पुरवठा स्थिर नसल्याने किमती अचानक वाढत आहेत. तीव्र उष्णतेमुळे पिकांचंही नुकसान होत आहे.

पुरंदरचे सीताफळ बाजारपेठेत दाखल

आपल्या दर्जेदार चवीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पुरंदरच्या सीताफळांची बाजारपेठेत एण्ट्री झाली आहे, मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे या पिकाला मोठा फटका बसला आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने सीताफळ बागा अडचणीत आल्या आहेत. पावसाअभावी यावर्षी सीताफळाची आवक कमालीची घटली असून, बाजारात येणाऱ्या फळांचा आकार लहान आहे आणि अपेक्षित गुणवत्ताही दिसून येत नाही. सध्या बाजारपेठेत दररोज फक्त 40 ते 50 क्रेट्स एवढीच संथ आवक सुरू आहे. गुणवत्तेत घसरण झाल्यामुळे सध्या सीताफळाला 1000 ते 2000 रुपये प्रति क्रेट इतका बाजारभाव मिळत आहे.

दरम्यान, आगामी काळातही जर पाऊस पडला नाही, तर आवक आणखी घटून सीताफळांचे बाजारभाव प्रचंड वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. पाऊस लांबल्याने पुरंदरचे शेतकरी चिंतेत असून आता सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

Follow Us
बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप
Sheikh Hasina | बांग्लादेश कट्टरपंथ्यांच्या ताब्यात; शेख हसीनांचा गंभीर आरोप, डिसेंबरमध्ये पुनरागमनाची घोषणा!
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला,
मोठी बातमी! रणनीतीकार प्रशांत किशोर थेट सुनेत्रा पवारांच्या भेटीला, बैठकीत... महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली वाढल्या
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील
कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर...
Sanjay Raut On Shivsena Hearing | आम्ही निश्चिंत आहोत...संविधानाशी द्रोह करणाऱ्यांचा शेवट कायद्यानेच होईल; सुनावणीनंतर संजय राऊतांचा इशारा!
...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील म
Sanjay Raut | ...अन् ते थेट कोर्टाच्या रेकॉर्डवर आलं.’ राऊतांनी सांगितली कोर्टातील महत्त्वाची बाब
देशाच्या संविधानावर विश्वास...राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...