AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Crime | घरावर दगड का मारतो?, वृद्धाच्या डोक्यात हाणली काठी, वर्ध्यात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

मृतकाचे आरोपीसोबत कोणताही वाद झाला नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती आहे. मात्र आरोपी मारोती क्षीरसागर हा रागीट स्वभावाचा आहे. त्याने कोणतेही कारण नसताना रागाच्या भरात मारहाण केल्याची माहिती आहे.

Wardha Crime | घरावर दगड का मारतो?, वृद्धाच्या डोक्यात हाणली काठी, वर्ध्यात जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
वर्ध्यात काठीने मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 23, 2022 | 2:28 PM
Share

वर्धा : जिल्ह्याच्या अल्लीपूर येथे दवाखान्यातून वृद्ध घरी जात होता. वृद्धाला माझ्या घरावर दगड का मारतो असं म्हणतं वाटेत अडवण्यात आले. काठीचे मारहाण (Strike) करण्यात आली. यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अल्लीपूरच्या विठ्ठल मंदिर वॉर्ड (Vitthal Mandir Ward) परिसरात घडली. सुधाकर कलोडे (70 वर्षे ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकृती बरी नसल्याने सुधाकर कलोडे (Sudhakar Kalode) हे रविवारी सकाळी दवाखान्यात गेले. दुपारी ते विठ्ठल वॉर्ड परिसरातून परत घरी जात होते. येथेच मागाहून आलेल्या मारोती क्षीरसागर याने सुधाकर यांच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार केला. यात सुधाकर हे गंभीर जखमी झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. पण उपचारादरम्यान सुधाकर यांची प्राणज्योत मालवली.

आरोपीस अटक

हाणामारीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुलसिंग पाटील व अल्लीपूरचे ठाणेदार सुनील गाढे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात संध्याकाळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीस रात्री अटक करण्यात आली आहे. छोट्याशा कारणावरून मारहाण केली. त्यामुळं आरोपीला आता जेलची हवा खावी लागणार आहे.

आरोपी रागीट स्वभावाचा

मृतकाचे आरोपीसोबत कोणताही वाद झाला नसल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आल्याची माहिती आहे. मात्र आरोपी मारोती क्षीरसागर हा रागीट स्वभावाचा आहे. त्याने कोणतेही कारण नसताना रागाच्या भरात मारहाण केल्याची माहिती आहे. मारोती क्षीरसागर याने रागाच्या भरात प्रहार केला. विनाकारण म्हाताऱ्या व्यक्तीचा जीव गेला. पण, आता मारोतीवर खडी फोडायची वेळ येणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.