AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अनेक राज्यांना बसणार अवकाळीचा तडाखा , महाराष्ट्रालाही मोठा इशारा

सध्या देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, मात्र पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अनेक राज्यांना बसणार अवकाळीचा तडाखा , महाराष्ट्रालाही मोठा इशारा
पुन्हा पावसाचा इशारा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 10:11 PM
Share

देशभरात सध्या उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये सरासरी तापमान हे 40 अंश सेल्सियसच्या वर पोहोचलं आहे. वाढत असलेलं तापमान उष्णतेच्या लाटेचा संकेत देत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल जाणवत असून, विचित्र वातावरण अनुभवयाला मिळत आहे. त्यामुळे उत्तर भारतामधील काही राज्यांमध्ये उन्हाचा कडाका थोडा कमी झाला असून, त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही दिवस आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण स्कायमेटकडून पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. पुढील तीन ते चार दिवस अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कुठे कुठे पावसाचा इशारा?

स्कायमेटच्या इशाऱ्यानुसार 17 एप्रिलपासून पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होत आहे. याचा मोठा परिणाम देशातील अनेक राज्यांवर होणार आहे. पुढील 24 तासांमध्ये अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, नागलँड, केरळ, अंदमान, निकोबार बेटं याठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

तर दुसरीकडे महाराष्ट्रात सध्या पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही, मात्र महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्णतेची लाट पहायला मिळण्याची शक्यता आहे. विषेत: मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच कडका जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासोबत गुजरात, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

मान्सूनच आगमन कधी होणार?

यंदा देखील गेल्या वर्षीप्रमाणेच देशासह राज्यात वेळेआधीच मान्सूची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. यंदा जूनमध्ये मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी मान्सूनवर अल निनोचं संकट घोगावत आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...