AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत हेमंत पाटील?, खासदारकीचे तिकीट कापलं होतं आता विधानपरिषदेवर

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हेमंत पाटील सतत आंदोलन करीत असतात. मोठा जनसंपर्क आणि शिवसैनिकांचे पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी खासदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले खासदार होते. परंतु संसदेत समाजाचे प्रश्न मांडा, असे सांगत लोकसभा अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळला.

कोण आहेत हेमंत पाटील?, खासदारकीचे तिकीट कापलं होतं आता विधानपरिषदेवर
EX MP HEMANT PATIL
| Updated on: Oct 15, 2024 | 1:15 PM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार हेमंत पाटील यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. राज्यपाल नियुक्त सात विधान परिषद सदस्यात त्यांची नेमणूक झाली आहे. हिंगोलीचे माजी खासदार असलेल्या हेमंत पाटील यांचे लोकसभेच्या वेळी तिकीट कापण्यात आले होते. त्यानंतर अलिकडेच त्यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यास राज्य मंत्रिपदाचा दर्जा देखील देण्यात आला होता. आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करुन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना आता मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेनेची सुरुवाती जर ठाणे आणि नंतर मुंबईतून झाली असली तर मराठवाड्यात शिवसेनेने मोठा विस्तार केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांनी भारावून जाऊन शिवसेनेच्या शाखांचे जाळे मराठवाड्यात वाढले. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांमुध्ये भगवा खांद्यावर घेऊन नांदेडचे हेमंत पाटील देखील सामील झाले होते. हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारांनी भारावलेल्या हेमंत पाटील यांच्यावर शाखा प्रमुख ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. या पदापासून शिवसेनेचा प्रचारास लागलेल्या हेमंत पाटील यांनी मग मागे पाहीले नाही. राजकारणात जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा चढत्या क्रमाने त्यांनी पायऱ्या चढत यश मिळविले. त्यांचा हा प्रवास रंजक आहे.

खासदार म्हणून  निवडून आले

हेमंत पाटील हे २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले. ते २०१९ ते २०२४ या काळात हिंगोलीचे खासदार होते. त्यांनी शिवसेना फूटीनंतर एकनाथ शिंदे सोबत जाणे पसंद केले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हिंगोलीतून खासदारकीची तयारी देखील केली होती. ऐनवेळी तिकीट कापल्याने ते नाराज होते. त्यानंतर त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, परंतू त्यांचा पराभव झाला.

रसवंतीगृह ते कारखाना मालक

एक साध्या रसंवती गृहापासून त्यांनी आपला प्रवास सुरु केला होता. पुढे हेमंत पाटील साखर कारखान्याचे मालक झाले. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जम बसवत त्यांनी जिल्ह्यात मोठी आर्थिक ताकदही उभी केली. ते नांदेड शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन करीत असतात. राज्यातील नामवंत कलाकार या सोहळ्याला हजेरी लावतात. नांदेडकरांना सांगीतिक महोत्सवाची मेजवानी मिळत असते.

कौटुंबिक पार्श्वभूमी

हेमंत श्रीराम पाटील यांच्याकडे विज्ञान शाखेची पदवी आहे. त्यांची जन्म तारीख १६ डिसेंबर १९७० अशी आहे.हेमंत पाटील यांच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील श्रीराम पाटील हे पाटबंधारे विभागात अभियंता होते. ते सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आई कमलबाई गृहिणी आहेत. पत्नी राजश्री पाटील या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहतात. हेमलता राजेंद्र देसले ह्या हेमंत पाटील यांच्या भगिनी आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.