आरोपी मुस्लीम असला की मोर्चे नको असे का म्हणता ?, संग्राम भंडारे यांचा सवाल
ख्रिचन आपल्याला तांदूळ देऊन धर्मांतर करीत आहेत. प्रत्येक जण आपल्या धर्माचा प्रचार करत आहे. तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या देवाभाऊपर्यंत घेऊन जायची जबाबदारी माझ्याकडे सोपवा असा सल्ला भंडारे यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

केस कापण्याच्या दुकानात सगळे जिहादीच आहेत. आपल्या चार वर्षांच्या मुलीला केस कापण्यासाठी घेऊन गेले तर जिहाद्याने तिला बाजूला नेऊन अतिप्रसंग केला. तिने घरी गेल्यानंतर सर्व प्रकार कथन केला. जग खोटे बोलेल, पण लहान मुले केव्हाच खोटे बोलणार नाहीत. काही लोकांना ही किरकोळ घटना वाटते, पण पीडीत मुलीच्या बापाला विचारा. छत्रपती शिवाजी महाराजांनी केव्हा जातीचा विचारा केला नाही. त्यांच्या काळात असे कृत्य करणाऱ्यांना जाग्यावर शिक्षा दिली जायची. आरोपी हिंदू असला तर मोर्चे काढता, आरोपी मुस्लीम असताना मोर्चे नको असे का म्हणता असा सवाल आज किर्तनकार संग्राम भंडारे यांनी आंबेगाव येथे केला.
गोठ्यातील गाय आणि घरातील माय वाचली पाहिजे यासाठी स्वराज्यात काम केले जायचे.पर्याय उपलब्ध करा हिंदूंनी मनावर घेतलं, तर सगळं काही होतं. संघटित व्हा आजपासून काम करायला सुरुवात करा. हिंदू संघटित नाही याला आपण सगळे जबाबदार आहोत असेही किर्तनकार संग्राम भंडारे यांनी म्हटले आहे.
मंचरच्या पांडवकालीन बारावसाठी हिंदूंना संघर्ष करावा लागतोय. पैसे करायच्या नादात धर्म टिकवायचा राहून जात आहे. अरे पैसे काय वर घेऊन जायचे आहे का ? वारी विठ्ठलाची आहे तर वारीच्या मार्गावर या जिहाद्यानी अल्लाचे बॅनर का लावले आहेत. वारीमध्ये इस्लामचा सध्या प्रचार सुरू आहे. टोपी जिहाद्याची आणि कपाळाला गंध नाही आणि हे बिस्कीट वाटप करत आहेत. मग, मशिदी वारकऱ्यांसाठी झोपायला खुल्या करा अशी मागणी संग्राम भंडारे यांनी केली.
कपाळाला नाही टिळा, त्याच्याशी संबंध टाळा
जो हिंदूच्या सोबत आहे. आम्ही त्याच्या सोबत आहोत. माता भगिनीच्या ज्यांच्या कपाळाला नाही टिळा, त्याच्याशी संबंध टाळा. खरी संपत्ती ही जमीन आहे, पण आपला हिंदू झोपला आहे. आपल्या जमिनी हे जिहादी घेत आहेत आणि आपले हिंदू त्यांना जमिनी विकत आहेत. जिहाद्यांची संख्या वाढत चालली आहे, हिंदूंची संख्या कमी होत आहे. हिंदूच्या जीवावर राजकारण करायचे आणि हिंदू अडचणीत आला की अंग काढून घ्यायचे. हिंदू संघटित होऊ नये यासाठी काही लोक काम करीत आहेत.
..आरोपी हिंदू होता तर लगेच मोठे मोर्चे काढले
या जिहाद्यांची सगळी गावातील दुकाने बंद करा नाहीत. तर आम्ही बुलडोजर फिरवू. वेळ आली तर मी अंगावर गुन्हे घ्यायला तयार आहे. पीडित मुलगी हिंदू आहे आणि आरोपी जिहादी आहे तर लगेच मोर्चे काढायला नको म्हणतात आणि तिकडे नसरापूरला आरोपी हिंदू होता तर लगेच मोठे मोर्चे काढले. चला, मी आज स्वतःला हिंदू म्हणायचे बंद करतो, पण हे जिहादी स्वत:ला मुस्लीम म्हणायचे बंद होईल का ? असा सवालही संग्राम भंडारे यांनी केला.
