AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौत निवडून येणार काय?; संजय राऊत यांचं भाकीत काय?

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिने राजकारणात उडी घेतली आहे. कंगकना भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. कंगनाने घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवातही केली आहे. तिच्या प्रचार रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या दरम्यान वादग्रस्त विधाने करून ती वादही ओढवून घेताना दिसत आहे.

कंगना रनौत निवडून येणार काय?; संजय राऊत यांचं भाकीत काय?
कंगना रनौत निवडून येणार का?
| Updated on: Apr 12, 2024 | 11:31 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. भाजपने तिला तिकीट दिलं आहे. कंगनाने जोरदार प्रचारही सुरू केला असून या प्रचारा दरम्यान बिनधास्त विधानेही करत आहे. त्यामुळे कंगना वाद ओढून घेतानाही दिसत आहे. पण कंगना खरोखरच निवडून येणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर कंगनाला संसदेपर्यंत जाता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे, असं भाकीतच वर्तवलं आहे. त्यामुळे कंगनाच्या विजयाबाबतच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कंगना निवडून येणार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांची आजा पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला महाविकासा आघाडीचे नेते आणि डाव्या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पालघरमध्ये महायुतीने उमदेवार दिला नाही. हा उमेदवार कोण येतो याबाबत साशंकता आहे. गावित जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर लढण्याची इच्छा आहे अशी परिस्थिती आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. दिल्लीतील भाजपचे लोक यांचे उमेदवार जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

निवडणूक आयोग दखल घ्या

कोल्हापूर हातकणंगले आणि कोकणात भाजप आणि मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी सत्र सुरू केलं आहे. अमिषं दाखवली जात आहेत. याची दखल महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावता आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचांना धमक्या देत आहेत. मतदारांना अमिष देत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मंडलिक वारसदार आहेत काय?

संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला. त्यामुळे कोल्हापुरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे वारसदार नाहीत तर मग मंडलिक वारसदार आहेत काय? कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली जात आहे ते निषेधार्ह आहे. शाहू महाराज आधीपासूनच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. राजकीय स्वार्थासाठी मंडलिक यांनी अशी भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

उत्तर मुंबईची जागा मिळाली तर

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. वर्षा गायकवाड नाराज नाहीत. महायुतीच्या सहापैकी एकही जागा मुंबईत निवडून येणार नाही. आमचं चॅलेंज आहे. उत्तर मुंबईची जागा जर शिवसेनेला मिळाली तर तीही जागा आम्ही निवडून आणू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?