AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रनौत निवडून येणार काय?; संजय राऊत यांचं भाकीत काय?

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत हिने राजकारणात उडी घेतली आहे. कंगकना भाजपच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. कंगनाने घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवातही केली आहे. तिच्या प्रचार रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या दरम्यान वादग्रस्त विधाने करून ती वादही ओढवून घेताना दिसत आहे.

कंगना रनौत निवडून येणार काय?; संजय राऊत यांचं भाकीत काय?
कंगना रनौत निवडून येणार का?
| Updated on: Apr 12, 2024 | 11:31 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. भाजपने तिला तिकीट दिलं आहे. कंगनाने जोरदार प्रचारही सुरू केला असून या प्रचारा दरम्यान बिनधास्त विधानेही करत आहे. त्यामुळे कंगना वाद ओढून घेतानाही दिसत आहे. पण कंगना खरोखरच निवडून येणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर कंगनाला संसदेपर्यंत जाता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे, असं भाकीतच वर्तवलं आहे. त्यामुळे कंगनाच्या विजयाबाबतच्या पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना कंगना निवडून येणार नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी राऊत यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांची आजा पालघरच्या बोईसरमध्ये जाहीर सभा होत आहे. या सभेला महाविकासा आघाडीचे नेते आणि डाव्या पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. पालघरमध्ये महायुतीने उमदेवार दिला नाही. हा उमेदवार कोण येतो याबाबत साशंकता आहे. गावित जरी शिवसेनेत असले तरी त्यांना कमळावर लढण्याची इच्छा आहे अशी परिस्थिती आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये गोंधळाचे चित्र आहे. दिल्लीतील भाजपचे लोक यांचे उमेदवार जाहीर करतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

निवडणूक आयोग दखल घ्या

कोल्हापूर हातकणंगले आणि कोकणात भाजप आणि मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी सत्र सुरू केलं आहे. अमिषं दाखवली जात आहेत. याची दखल महाराष्ट्र निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कठोरपणे लावता आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाची लोक सरपंचांना धमक्या देत आहेत. मतदारांना अमिष देत आहेत हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

मंडलिक वारसदार आहेत काय?

संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला. त्यामुळे कोल्हापुरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीचे वारसदार नाहीत तर मग मंडलिक वारसदार आहेत काय? कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर आहे. महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर ज्या पद्धतीने चिखलफेक केली जात आहे ते निषेधार्ह आहे. शाहू महाराज आधीपासूनच सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. राजकीय स्वार्थासाठी मंडलिक यांनी अशी भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

उत्तर मुंबईची जागा मिळाली तर

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. वर्षा गायकवाड नाराज नाहीत. महायुतीच्या सहापैकी एकही जागा मुंबईत निवडून येणार नाही. आमचं चॅलेंज आहे. उत्तर मुंबईची जागा जर शिवसेनेला मिळाली तर तीही जागा आम्ही निवडून आणू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.