AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपशी हातमिळवणी करणार का ? संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान काय ?; म्हणाले, आम्ही हात अपवित्र…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केला. दोन्ही नेत्यांमध्ये लिफ्टमध्ये आणि लिफ्टबाहेर मिळून पाच मिनिटं चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संवादाची कोंडी फुटल्याचंही बोललं जात असून उद्धव ठाकरे भाजपसोबत येणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भाजपशी हातमिळवणी करणार का ? संजय राऊत यांचं सर्वात मोठं विधान काय ?; म्हणाले, आम्ही हात अपवित्र...
| Updated on: Jun 28, 2024 | 11:18 AM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल विधान भवनात भेटले. दोघांनीही लिफ्टमधून प्रवास केला. दोघांनीही एकमेकांची विचारपूस केली. साधारण पाच मिनिटं ही भेट झाली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिलं. त्यामुळे उद्धव ठाकरे हे महायुतीत येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना कालच पूर्णविराम दिला असला तरी आजही ही चर्चा सुरूच आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. आम्ही हात अपवित्र करून घेणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपबरोबर जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अनेकदा दिल्लीत पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रीही आमच्या लिफ्टमध्ये असतात. महाराष्ट्राच्या विधान भवनात व्यवस्था अशी आहे की, एकत्रच लिफ्टने प्रवास करायचा असतो. एकाच सभागृहात जायचं असतं. दोन नेते समोरासमोर आले तर नमस्कार करणं हा शिष्टाचार असतो. त्या शिष्टाचारानुसार एकमेकांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्यात राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत पुन्हा हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

तिन्ही पक्षाचे उमेदवार निवडून येतील

विधान परिषद निवडणुकीवरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी यात नकारात्मक बोलणार नाही. शेकापचे नेते भाई जयंतराव पाटील हे आमचे सहकारी आहेत. शेकापने आम्हाला सहकार्य केलं नाही या मताशी शिवसेना सहमत नाही. शेकापने अनेक ठिकाणी रायगड आणि हिंगोलीत किंवा जिथे जिथे त्यांची ताकद आहे, तिथे त्यांनी आम्हाला मदत केली. काही ठिकाणी दुर्देवाने पराभव झाला. त्याचं खापर आम्ही इतर घटक पक्षांवर फोडणार नाही. जयंतराव पाटील हे सुद्धा निवडून येतील विधान परिषदेत. आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं आम्ही उमेदवार देतोय तोही निवडून येईल. अशी रचना आम्ही करत आहोत, असं राऊत म्हणाले.

फुटलेला अर्थसंकल्प

राज्याचा आज अर्थसंकल्प आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राज्याचा अर्थसंकल्प आधीच फुटला आहे. या सरकारने फोडला आहे. काही वर्तमानपत्रात या अर्थसंकल्पाची माहिती आली आहे. सरकारने कितीही घोषणा केल्या तरी काही होणार नाही. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी अनेक घोषणा केल्या होत्या. पण त्यांना राज्यातील जनतेने स्वीकारलं नाही. यांना काय स्वीकारणार? असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.