अमरावतीत (Amravati) विद्यार्थ्याचा (Student) पेपर हिसकावून घेतल्याने त्याने आत्महत्या केली. यावर कोणत्याही संस्थांनी असे करू नये, कोणाला आर्थिक अडचण असेल तर ती वेगळ्या पद्धतीने दूर केली जाऊ शकते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांनीही कमजोर पडू नये, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या. स्वतः गृहमंत्री यांच्याशी बोलणार आहे. यात लक्ष घालायला सांगणार आहे, खूप चटका लावणारी ही घटना आहे, असे त्या म्हणाल्या. पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. इलेकशन संपले आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले, अशी टीका त्यांनी केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न चालल्याचेही त्या म्हणाल्या.