AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय.

Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण
यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 18, 2022 | 12:51 PM
Share

यवतमाळ : यवतमाळच्या पुसद (Pusad) येथे एका पोलीस जमादाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू कोरडे (Vishnu Korde) असे या पोलीस जमादाराचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील (Dr. Dilip Bhujbal) यांना जबाबदार धरले आहे. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिट्ठीत पोलीस अधीक्षक यांनी विनाकारण त्रास दिला. अपमानित केले. गंभीर आजारी असतानाही बदलीची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे विष्णू कोरडे यांनी लिहून ठेवले आहे. याबाबत सीबीआय चौकशी करावी, असेही त्यांनी लिहून ठेवले आहे.

पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय. त्यामुळे पोलीस अधीक्षकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचा भाऊ विलास कोरडे यांनी केली. पोलीस अधीक्षकांच्या जाचामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी त्रस्त असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राजू नजरधने यांनी केला आहे.

चिठ्ठीत नेमकं काय

विष्णू कोरडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी चिठ्ठीत लिहिलं की, मला पोलीस अधीक्षकांनी खूप त्रास दिली. माझ्यासारख्या बऱ्याच पोलिसांना ते त्रास देतात. कर्मचाऱ्यांना नेहमी दबावाखाली ठेवतात. मी बदली मागितली. पण, मला बदली दिली नाही. माझी तब्ब्येत बरी नसताना मला त्रास दिला जात होता. शेवटी त्रास किती दिवस सहन करायचा. त्यामुळं शेवटचा निर्णय घेतला. पण, या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही विष्णू कोरडे यांनी केली आहे.

Follow Us
रस्ते आहेत, अपघात होणारच; बालकाच्या मृत्यूनंतर नेत्याचं धक्कदायक विधान
रस्ते आहेत तर अपघात होणारच; भोरमधील बालकाच्या मृत्यूनंतर शंकर मांडेकरांच्या विधानाने खळबळ
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोस
मुंबईकरांनो सावधान! 4 हजारहुन अधिक... मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील...
अध्यक्षांच्या गोंधळलेल्या भूमिकेमुळे... सुनावणीनंतर ठाकरे गटातील बड्या नेत्याची सुचक प्रतिक्रिया
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल...
शिवसेना कुणाची? आजची सुनावणी संपली, उद्या पुन्हा कपिल सिब्बल... नेमकं काय घडणार?
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान