AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय.

Yavatmal Police | यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास, पोलीस अधीक्षकांवर त्रास दिल्याचा आरोप, चिठ्ठीत लिहिले जीवन संपविण्याचे कारण
यवतमाळात पोलीस जमादाराने घेतला गळफास
| Edited By: | Updated on: Jun 18, 2022 | 12:51 PM
Share

यवतमाळ : यवतमाळच्या पुसद (Pusad) येथे एका पोलीस जमादाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. विष्णू कोरडे (Vishnu Korde) असे या पोलीस जमादाराचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील (Dr. Dilip Bhujbal) यांना जबाबदार धरले आहे. मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिट्ठीत पोलीस अधीक्षक यांनी विनाकारण त्रास दिला. अपमानित केले. गंभीर आजारी असतानाही बदलीची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे विष्णू कोरडे यांनी लिहून ठेवले आहे. याबाबत सीबीआय चौकशी करावी, असेही त्यांनी लिहून ठेवले आहे.

पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी

कोरडे यांची नेमणूक बिटरगाव पोलीस ठाण्यात होती. त्यांचा गंभीर अपघात झाला असल्याने त्यांचे शरीर दुखापतग्रस्त होते. त्यांची एका डेथ इन कस्टडी प्रकरणात चौकशी सुरू आहे. ही चौकशी पुसदमध्ये हस्तांतरित करावी. बदलीदेखील पुसदमध्ये करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र पोलीस अधीक्षकांनी ती जाणीवपूर्वक बेदखल केली. असा आरोप चिठ्ठीत करण्यात आलाय. त्यामुळे पोलीस अधीक्षकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मृतकाचा भाऊ विलास कोरडे यांनी केली. पोलीस अधीक्षकांच्या जाचामुळे अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी त्रस्त असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार राजू नजरधने यांनी केला आहे.

चिठ्ठीत नेमकं काय

विष्णू कोरडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या विरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी चिठ्ठीत लिहिलं की, मला पोलीस अधीक्षकांनी खूप त्रास दिली. माझ्यासारख्या बऱ्याच पोलिसांना ते त्रास देतात. कर्मचाऱ्यांना नेहमी दबावाखाली ठेवतात. मी बदली मागितली. पण, मला बदली दिली नाही. माझी तब्ब्येत बरी नसताना मला त्रास दिला जात होता. शेवटी त्रास किती दिवस सहन करायचा. त्यामुळं शेवटचा निर्णय घेतला. पण, या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर कारवाई झाली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणीही विष्णू कोरडे यांनी केली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.