AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रोज मजुरी करावी की,पाणी भरावं”; पाणीटंचाईमुळं रोजंदारीवर जाणाऱ्यांचं मरण…

अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे कालावधी संपूनदेखील पाईपलाईन दुरुस्त झाली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

रोज मजुरी करावी की,पाणी भरावं; पाणीटंचाईमुळं रोजंदारीवर जाणाऱ्यांचं मरण...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 05, 2023 | 8:32 PM
Share

यवतमाळ : गेल्या पंधरा दिवसांपासून यवतमाळ शहरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. ऐन जून महिन्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. अमृतची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामूळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हातपंपावर महिलांसह पुरुष मंडळीची मोठी गर्दी दिसत आहे. तर रोज मोलमजूरी करणाऱ्या महिलांना रात्री-अपरात्री कुपनलिकेवर पाण्यासाठी जावे लागत आहे. पाण्याच्या या परिस्थितीमुळे आता पाणी भरावं की, रोज मजूरी करावी असा प्रश्न आता नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील रहिवाशांना नळाला पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना बोअरवेल व हातपंपाचे पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे.

दरम्यान, या भागांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाने टाकलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा मोठा भाग 26 मे रोजी दत्त चौक परिसरात फुटल्याने पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.

जीवन प्राधिकरण विभागाच्यावतीने दत्त चौकात फुटलेल्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू करण्यात आले. मात्र अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे कालावधी संपूनदेखील पाईपलाईन दुरुस्त झाली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

या परिस्थितीतमध्ये दत्त चौकातून जाणारी पाईपलाईन फुटण्यापूर्वीच खोजा कॉलनी, पिंपळगाव, वडगाव, वंजारी फैल, वैभवनगर येथे राहणाऱ्या नागरिकांची आता पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आजवर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. या भागात मागील 15 दिवसांपासून पाण्यासाठी ओरड सुरू असल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे.

नुकताच जून महना चालू झाला आहे मात्र मान्सून लांबल्याने आता राज्यातील अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे आता तरी पाण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....