कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला

राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Dead bodies disposal) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहांचे दहन करण्यात येणार आहे.

कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाचे दफन की दहन? आयुक्तांचा निर्णय मलिकांनी मागे घ्यायला लावला
Follow us
| Updated on: Mar 30, 2020 | 11:24 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा विषाणूंचा कहर दिवसेंदिवस वाढत (Corona Dead bodies disposal) आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहांचे दहन करण्यात येणार आहे. हा व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचे दहन होणार आहे, असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबई महापालिकेने नियमावली केली आहे.

मात्र प्रवीण परदेशींच्या या निर्णयावर कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला आहे. “कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी पालिकेने परिपत्रक जारी केले होते. मात्र मी त्यांच्याशी याबाबत बोललो. त्यांना या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्यानंतर पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे परिपत्रक मागे घेतलं आहे,” अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विटद्वारे दिली.

मुंबई महापालिकेच्या पत्रानुसार, कोरोना व्हायरसमुळे (Corona Dead bodies disposal) मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दहन करण्यात येणार आहे. या दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे मृतदेह दफन करता येणार नाही, असा उल्लेख या नियमावलीत केला आहे.

तसेच जर मृताच्या नातेवाईकाने मृतदेह दफन करण्याची मागणी केली तर त्याला मुंबईच्या बाहेर जाऊन मृतदेह दफन करावा लागेल.यावेळी कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करावे लागेल. तसेच याविषयी मुंबई महापालिकेला सर्व लिहून द्यावं लागेल, असेही यात म्हटलंं आहे.

त्याशिवाय फक्त पाच जणांना अंत्ययात्रेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल, असेही पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हटलं आहे.

तसेच कोणत्याही कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह घरी घेऊन जाता येणार नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांचा अंत्यसंस्कार रुग्णालयाजवळील स्मशानभूमीत करण्यात येईल. कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून त्या मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली (Corona Dead bodies disposal) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.