AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras Case | हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची अवस्था वेदनादायी – जितेंद्र आव्हाड

मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, रातोरात त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येते. हे सगळं मन व्यथित करणार आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणले. (Jitendra Awhad comment on Hathras Case)

Hathras Case | हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची अवस्था वेदनादायी - जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Oct 05, 2020 | 6:20 PM
Share

मुंबई: एका मुलीवर बलात्कार होतो, हत्या होते, रातोरात त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात येते. हे सगळं मन व्यथित करणार, यातना देणार आहे. इतक्या क्रूरपणे प्रशासनाने वागावं हे योग्य नाही, असं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. हाथरस प्रकरणी सरकार बोलायला तयार नाही, सरकारची माणसं तिथे जायला तयार नाहीत. कुटुंबाला विळखा घालून त्यांना बंद करण्यात आले. दलित कुटुंबाची आजच्या युगामध्ये ही अवस्था वेदनादायी आहे, अशा भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. (Jitendra Awhad comment on Hathras Case)

हाथरस प्रकरणी आम्हाला माध्यमातून माहिती मिळाली आहे. त्यामधून सध्या परिस्थिती भयानक दिसत आहे. राष्ट्रपती लागवट , राजीनाम्याची अथवा सरकार बरखास्त करण्याची मागणी करून काही फायदा नाही, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले. आता सुरु आहे त्यापेक्षा आणखी जोराने त्या ठिकाणी हुकुमशाही करण्यात येईल. तिथे लहान जाती आणि तिथल्या शोषितांबद्दल प्रेम आपुलकी असल्याचे अजिबात नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

इंदिरा गांधींची आठवण

बिहारमध्ये यापूर्वी एक हत्याकांड झाले होते. इंदिरा गांधी त्यावेळी सत्तेत नव्हत्या. मात्र, त्या ठिकाणी गेल्या होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी जिद्द ठेवून त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. त्यावेळी आसपासच्या परिसरातील हजारो लोक त्या ठिकाणी जमले होते. इंदिरा गांधींनी त्या लोकांना भाषण द्यायला आली नसून पीडित कुटुबांचे अश्रू पुसण्यासाठी आली आसल्याचे सांगितले. यानंतर देशातील वातावरण बदललं आणि इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. हाथरस प्रकरणाने देशातील वातावरण बदलले आहे. ज्या पद्धतीचं वर्तन सत्ताधाऱ्यांचा आहे त्यानुसार सत्ते पुढे काही चालू शकत नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाले आहे. सत्ताधाऱ्यांच्या या भावनेचे उत्तर जनतेच्या मनात असत जनताच योग्य वेळेला योग्य उत्तर देईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत यूपी पोलिसांनी केलेल्या वर्तनाबद्दल बोलताना म्हटले.

मुंबई पोलीस अनं महाराष्ट्राच्या बदनामीची गरज नव्हती

मुंबई पोलीस सुशांतच्या रिपोर्ट मध्ये काही लपवतील अशी शक्यता अजिबात नव्हती. तेच सत्य आता समोर आलं आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. मुंबईने आपल्याला भरभरून दिलं आहे. मुंबई पोलिसांना आणि महाराष्ट्राला एवढं बदनाम करायची गरज नव्हती, असं आव्हाड म्हणाले आहेत. याप्रकरणी कोणाकडूनही माफीची अपेक्षा नाही. सुशांत प्रकरणात महाराष्ट्राचा अपमान ज्या पद्धतीने केला गेला ते महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणाऱ्यांना अजिबात आवडलं नसल्याचं, जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या:

पुढील एक महिना मुंब्य्रात कार्यक्रमाला येणार नाही : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांकडून ठाण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न निकाली, पोलिसांना 567 घरं मिळणार

(Jitendra Awhad comment on Hathras Case)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?.

दिल्लीच्या आंदोलनावेळी कॉकरोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम सस्पेंड, पुढच्या क्षणात रिकव्हर, नेमकं काय घडलं?