AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BEST STRIKE LIVE : मॅरेथॉन बैठकीत तोडग्याची आशा

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईतील जवळपास 30 हजार 500 कर्मचारी 7 जानेवारी पासून संपावर गेले. लोकल प्रमाणे बेस्ट देखील मुंबईची लाईफलाईन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संपांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या संपामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे मात्र हाल […]

BEST STRIKE LIVE : मॅरेथॉन बैठकीत तोडग्याची आशा
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी मुंबईतील जवळपास 30 हजार 500 कर्मचारी 7 जानेवारी पासून संपावर गेले. लोकल प्रमाणे बेस्ट देखील मुंबईची लाईफलाईन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी बेस्टने प्रवास करतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संपांमुळे मुंबईच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या संपामुळे दररोज बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये वीजपुरवठा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मात्र संपावर तोडगा न निघाल्यास बेस्टचे वीजपुरवठा कर्मचारीही संपावर जाण्याच्या तयारीत आहे. जर हे कर्मचारी संपावर गेले तर मुंबई अंधारात असेल.

LIVE UPDATE

  • 6.45 PM : संपावर तोडग्याचा अद्याप पत्ता नाही, भाजपकडून श्रेय घेण्यासही सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामुळे चर्चा होत असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं
  • 6.40 PM : महापौरांनी आम्हाला चर्चेला बोलवलंय, जी काय चर्चा होईल ती कामगारांसमोर ठेवण्यात येईल, मग जो काही निर्णय होईल तो कामगार घेतील – शशांक राव
  • 6.35 PM : शिवसेना संपकऱ्यांना धमकावतेय, संप मोडीत काढण्याचा प्रयत्न करतेय, तीन दिवसांनंतरही संप संपलेला नाहीय, संप मिटवायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग काढावा लागेल – राधाकृष्ण विखे पाटील
  • 6.20 PM – महापौर बंगल्यावर तीन तासांपासून बैठक, उद्धव ठाकरेंनाही संपावर तोडगा निघेना, तोडग्यासाठी शिवसेनेने कंबर कसली
  • 5.20PM बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी महापौरांचे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीला बैठकीचे निमंत्रण, कामगार नेते शशांक रावही महापौर बंगल्यावर बैठकीसाठी हजर राहणार
  • 3.15 PM उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता महापौर बंगल्यात दाखल, बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी महापौर बंगल्यावर चर्चा, चर्चेसाठी आयुक्त अजोय मेहता महापौर बंगल्यावर, बैठकीसाठी उद्धव ठाकरेही महापौर बंगल्यात दाखल
  • 1.23 PM – कोणत्याही निर्णयाविना बेस्टच्या कृती समितीची बैठक संपली, बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी आता मंत्रालयातून हालचाली, बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडेंना मुख्य सचिवांनी बोलावलं

संबंधित बातमी – संप मिटल्यावर बुके द्या, एकत्र राहा, राज यांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सल्ला

दरम्यान, बस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. मात्र अनेक ठिकाणी हे टॅक्सी चालक संधीचा फायदा घेताना दिसून येत आहेत. संप असल्याने मुंबईकरांना प्रवास करण्यासाठी इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटीच्या काही बस सोडण्यात येत आहेत, तर जास्तीच्या लोकलही सोडण्यात येत आहे. तरीही अनेकांना टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांच्या या मजबुरीचा फायदा घेत टॅक्सी चालक त्यांच्याकडून मनमानी पैसे घेत आहेत. मीटरने न जाता वाट्टेल तेवढे पैसे हे टॅक्सी चालक प्रवाशांकडून लुटत आहेत.

मुंबईच्या टॅक्सीचालकांची ही मनमानी काही नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ओला-उबर टॅक्सी चालकांनी संप पुकारला होता. तेव्हाही प्रवाशांकडून अशाच प्रकारची लूट करण्यात आली होती. आधीच बसेस नसल्याने प्रवाशांना टॅक्सीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहे, त्यातच वाट्टेल तो भाडं सांगत हे टॅक्सी चालक प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत आहेत.

मुंबईत पाऊस असो, कुणाचं आंदोलन असो किंवा बँकेचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप असो, यात हाल मात्र मुंबईकरांचेच होतात, हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून हे कर्मचारी संप पुकारतात, मात्र या सर्वांचा सर्वात जास्त फटका हा सामान्य मुंबईकरांना बसतो. दोन दिवसांपासून बेस्ट कर्मचारी संपावर आहेत, संप मागे घेण्यासाठी सरकार आणि कर्मचारी संघटनांमध्ये अनेक बैठका होत आहेत, तरीही मागील दोन दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. यातच टॅक्सीचालकांच्या या मनमानी कारभारामुळे मुंबईकर मात्र त्रस्त झाले आहेत, सरकारने लवकरात लवकर हा संप संपवत बस सेवा पुन्हा सुरु करावी अशी मागणी आता मुंबईकर करत आहेत.

विविध मागण्यांसाठी बेस्टचे सुमारे 30 हजार 500 कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहोत. तर बेस्ट प्रशासनाने काल कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करत कामावर रुजू व्हा अन्यथा घरं सोडा अशी नोटीस बजावली आहे. वेतननिश्चिती तसेच बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिका ‘अ’ अर्थसंकल्पात विलिनीकरण यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 
* ‘बेस्ट’ उपक्रमाचा ‘क’ अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर झालेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे.

* 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,930 रुपयांनी सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये त्वरीत वेतननिश्चिती करावी.

* एप्रिल 2016 पासून लागू करावयाच्या नवीन वेतन करारावर तातडीने चर्चा सुरू करावी.

* 2016-17 आणि 2017-18 करिता पालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस द्यावा.

* कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न सोडवावा.

* अनुकंपा भरती तातडीने सुरू करावी.

संबंधित बातम्या

‘बेस्ट’ संप : सेनेच्या युनियनची माघार, शशांक राव मात्र ठाम

LIVE बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, युनियनमध्ये फूट?  

Follow Us
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.