AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत पाकिस्तान यांच्यात तणाव, तरीही 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल, बॉर्डर बंद असतानाही..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. पाकिस्तानकडून सतत जलसिंधू कराराच्या मुद्द्यावर धमक्या दिल्या जात आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे आली. तिसऱ्या देशाच्या माध्यमातून तब्बल 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल झाल्याची माहिती मिळतंय.

भारत पाकिस्तान यांच्यात तणाव, तरीही 150 पाकिस्तानी नववधू भारतात दाखल, बॉर्डर बंद असतानाही..
pakistani bride in India
| Updated on: Aug 23, 2026 | 9:01 AM
Share

पहलगामवरील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध अधिक तणावात आली. भारताने सिंधू जल करारही स्थगित केला. सर्व सेवा बंद केल्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले उद्धवस्थ केली. पाकिस्तानी नागरिक आता थेट भारतात येऊ शकत नाहीत. मात्र, भारत आणि पाकिस्तान सीमा बंद असतानाही पाकिस्तानातून भारतात तब्बल 150 नववधू दाखल झाल्या. भारतीय मुलांशी त्यांनी लग्न केले. तिसऱ्या देशांमार्फत प्रवास करून पाकिस्तानातील 150 हून अधिक नववधू भारतात दाखल झाल्या. थेट पाकिस्तान भारत सेवा पूर्णपणे बंद आहे. ज्यामुळे तिसऱ्या देशातून या नववधू भारतात दाखल झाल्या. मस्कत, कोलंबो, ढाका, दुबई आणि कतारमार्गे विमान प्रवास करत या नववधू भारतात आल्यात.

भारतात आल्यानंतर नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, रायपूर, पुणे आणि भोपाळ यांसारख्या शहरांमध्ये त्यांनी प्रवेश केल्याची माहिती मिळतंय. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर वाघा-अटारी सीमा बंद करण्यात आली. त्यामुळे भारतातील आपल्या नियोजित वरांशी विवाह करण्यासाठी पाकिस्तानातील अनेक तरुणींच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला होता. लग्न तर करायचे होते, पण बॉर्डर बंद असल्याने येणेही भारतात शक्य नव्हते.

मग काय या पाकिस्तानी नववधूंनी तिसऱ्या देशाच्या माध्यमातून भारतात येण्याचा निर्णय घेतला. या विवाहांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने विशेष सवलत दिली. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेले भारत-पाकिस्तानातील विवाह अखेर पार पडू शकले. सामान्य परिस्थितीत भारतीय व्हिसा असलेले पाकिस्तानी नागरिक वाघा-अटारीमार्गे भारतात येऊ शकतात. मात्र, सीमा बंद असल्याने यावेळी त्यांना तिसऱ्या देशातून विमानाने भारतात यावे लागले.

एप्रिल ते जूनदरम्यान सुमारे 150 पाकिस्तानी नववधू भारतात आल्या असून, त्यांच्यासोबत 450  नातेवाईकही आले. नातेवाईकांना ठराविक कालावधीत पाकिस्तानात परतण्याची अट घालण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे भारतात विवाहासाठी येण्याची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. आणखी 300 जण अद्याप भारतात येऊन विवाह करण्यासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळतंय. नागपूरमध्येही पाकिस्तानातून आलेल्या काही नववधूंचे विवाह भारतीय वरांसोबत पार पडले.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार