AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश

AI CJI Chandrachud: कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (AI) देशाचे सरन्यायाधीशांनी मोठे वक्तव्य केले आहे. एआय हे भविष्यात गेम चेंजर ठरु शकते, असे त्यांना वाटते. पण यासोबतच या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी त्यांनी धोके ओळखण्याचा सल्ला पण दिला. भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेदरम्यान त्यांनी एआयविषयी मत मांडले.

AI तर गेम चेंजर; न्यायालयात त्याचा वापर करणार का? काय म्हणाले सरन्यायाधीश
न्यायापालिकेत एआयचा वापर होणार का?
| Updated on: Apr 14, 2024 | 3:19 PM
Share

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मोठी क्रांती आणू शकते. हा आधुनिक तंत्रज्ञान गेम चेंजर असल्याचे मत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी मांडले. एआयचा भारतीय न्याय व्यवस्थेत वापर केल्या जाऊ शकतो, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत एआयविषयी जवळपास प्रत्येक क्षेत्रात चर्चा सुरु आहे. एआय किती फायदेशीर आणि किती नुकसानकारक आहे, याची चर्चा सुरु आहे. याबाबत देशाचे सरन्यायाधीशांनी पण त्यांचे मत मांडले आहे. काय म्हणाले चंद्रचूड…

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारत आणि सिंगापूर न्यायीक परिषदेत तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांचे मत मांडले. त्यांनी एआयच्या आवश्यकतेवर पण भर दिला. न्यायीक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि एआयचा वापर हा गेम चेंजर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याचा काळ हा बदल स्वीकारण्याचा आहे, आपल्याला तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर कसा करता येईल हे बघावे लागेल, असे ते म्हणाले. त्यांनी एआयच्या वापरासंबंधी इशारा पण दिला आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर होता कामा नये, असा इशारा पण त्यांनी दिला.

एआयचा चुकीचा वापर

  1. सरन्यायाधीशांनी एआयच्या चुकीच्या वापरावर चिंता व्यक्त केली. या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर व्हायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. एआयमुळे श्रीमंत आणि गरिबांतील दरी अधिक रुंदावणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
  2. अनेक उच्च न्यायालयात AI चा वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. एआयच्या मदतीने लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन सेवा देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही सेवा सध्या हिंदी भाषेसह अन्य 18 प्रादेशिक भाषामध्ये पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
  3. अनेक कामात एआयचा मोठा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले. यामध्ये डॉक्युमेंट रिव्ह्यू, केस मॅनेजमेंट, शेड्युलिंग यांचा समावेश आहे. एआयच्या मदतीने प्रशासनाचे काम सुलभ होणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पेपरवर्क कमी होईल. पैशांसह वेळेची बचत होईल. तर याचिकाकर्त्यांना जलद न्यायदानासाठी पण एआय मदत करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.