AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..

टीव्ही9 नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026' मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. यावेळी देशातील एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरही बोलताना अखिलेश यादव दिसले.

भाजपाला लाल टोपी आणि लाल सिलेंडरची भीती वाटते, अखिलेश यादव यांची सरकारवर जोरदार टीका..
Akhilesh Yadav
| Updated on: Mar 24, 2026 | 12:41 PM
Share

टीव्ही9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट-2026’ मध्ये बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठी टीका केली. अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारतीय जनता पार्टी लाल टोपी आणि लाल सिलेंडरला घाबरत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची जी समस्या आणि मोठा तुटवडा आहे, यावर बोलताना दिसले. अखिलेश यादव यांनी म्हटले की, आज एक सामान्य माणूस एलपीजी गॅस मिळत नसल्याचे समस्येत आहे. पुढे बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, एलपीजीला लोक हारवलेला गॅस बोलत आहेत. सरकारवर थेटपणे टीका करताना त्यांनी म्हटले की, अगोदर बोरीनंतर चोरी. आता सरकारने फक्त चपातीची साईज छोटी करण्यास सांगू नये, म्हणजे झालं.

भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले 

इराण आणि अमेरिका युद्धाबद्दल बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, भारताच्या लोकांना मोठे स्वप्न दाखवण्यात आले होते की, आपण विश्वगुरू बनू. हे स्वप्न दाखवले गेले होते तर तु्म्ही लोकांना हे देखील दाखवायला हवे होते की, भारत हे युद्ध रोखू शकतो. पण तुम्ही हे बघितले की, कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय सरकारचे प्रमुख खासदार पाकिस्तानात उतरले.

तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले

सरकारला चिमटा काढत त्यांनी म्हटले की, तुम्ही इस्त्रायलला गेलात आणि युद्ध सुरू झाले. जर तुम्ही इस्त्रायलवरून येताना इराणमध्ये थांबले असता तर युद्ध झाले नसते. विश्वगुरूच्या मुद्यावरून बोलताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, तुमचे सर्व देशांसोबत संबंध चांगले आहेत पण भूमिका काय आहे? तुम्ही भूमिका असती तर युद्ध झाले नसते. जर खरोखरच तुम्ही विश्वगुरू असते तर युद्ध झाले नसते.

अखिलेश यादव यांचा अत्यंत गंभीर आरोप 

अमेरिकेने तुमच्यावर निर्बंध घातले. त्यावेळी तुम्हीही बोलू शकले असता जर युद्ध झाले तर आम्हीही अमेरिकेसोबत व्यापार करणार नाहीत. तुमचे परराष्ट्र धोरणही परकीय देशांकडून ठरवले जात आहे. याचा अर्थ आपल्या देशाला कुठेतरी ठामपणे उभा राहवे लागेल. जर सरकार काही चांगले निर्णय घेत असेल तर नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. पण कधीच विश्वगुरू बनण्याचा मुद्दा स्वीकार करणार नाहीत.

Follow Us
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.