AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप चांगलं असणंही खूप धोकादायक, उच्च न्यायालयाची त्या प्रकरणात टिप्पणी, याचिकाही फेटाळली!

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीची चांगलीच चर्चा होत आहे. कधी कधी खूप चांगले असेही धोकादायक ठरू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

खूप चांगलं असणंही खूप धोकादायक, उच्च न्यायालयाची त्या प्रकरणात टिप्पणी, याचिकाही फेटाळली!
allahabad high courtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 02, 2026 | 7:41 PM
Share

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘कधीकधी खूप चांगलं होणं खूप धोकादायक असतं’ अशी टिप्पणी केली आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मोहीबुल्लाह यांना दिलासा देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलंय. 2024 साली मोहीबुल्लाह यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत रामपूर मतदासंघातून घनश्याम सिंह लोधी यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांनी समाजवादी पार्टीचे मोहीबुल्लाह यांच्या निवडीवर आक्षेप व्यक्त करत ही याचिका दाखल केली होती.

न्यायालयाने याचिका फेटाळली, विशेष टिप्पणीची चर्चा

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत मोहीबुल्लाह यांची खासदार म्हणून निवड वैध असल्याचा निर्वाळा दिला. दाखल याचिकेत निवडीवर आक्षेप घ्यावा असा कोणताही स्पष्ट आधार देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सुनावणी योग्य नाही, असे मत यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच न्यायालयाने ही याचिका फेटाळतान विशेष टिप्पणी केली आहे.

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या काही ओळींचा उल्लेख

ही टिप्पणी करताना न्यायालयाने केटी अरवंदम विरुद्ध टी सत्यपाल या प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिला. न्यायालयीन प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा दुरुपयोग केला जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने व्यक्त केली. कायद्याच्या उदार धोरणाचा दुरुपयोग करू नये, असे सांगताना न्यायालयाने नोबेल पारितोषक विजेते आणि प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या काही ओळींचा उल्लेख केला. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ‘खूप जास्त चांगले असेणेही खूप धोकादायक असते’ असे मत शॉ यांनी व्यक्त केले. याच वाक्याचा न्यायालायने उल्लेख करत न्यायालयाच्या उदार धोरणाचा दुरुपयोग करू नये, अशी टिप्पणी केली.

प्रकरण काय होते?

घनश्याम सिंह लोधी यांनी 2024 सालची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढवली होती. रामपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे नेते मोहिबुल्लाह यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोहिबुल्लाह यांचा विजय झाला होता. दरम्यान, या निवडणुकीत मोहिबुल्लाह यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123(7) चा भंग केला आहे. उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला होता, असा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Follow Us
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...
अमित साटम की चाटम? साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
Sanjay Raut Press | अमित साटम की चाटम? मृत्यूंवर हसणं महागात पडणार; अमित साटम यांच्या हकालपट्टीची थेट संजय राऊतांकडून मागणी!
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष
महाराष्ट्रात लागू होणार समान नागरी कायदा? फडणवीस सरकारच्या मोठ्या हालचाली सुरू; आजच्या अधिवेशनाकडे राज्याचे लक्ष