AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result : बिहारमध्ये नवं सरकार सत्तेत येण्यास काही तास बाकी, राज्याला ‘या’ समस्यांपासून दिलासा मिळणार?

निवडणुका झाल्या, निकालही लागणार असले तरी बिहारमध्ये अनेक मोठ्या समस्या असणार आहेत. जाणून घेऊयात नेमक्या काय आहे बिहारकरांच्या समस्या.

Bihar Election Result : बिहारमध्ये नवं सरकार सत्तेत येण्यास काही तास बाकी, राज्याला 'या' समस्यांपासून दिलासा मिळणार?
| Edited By: | Updated on: Nov 10, 2020 | 9:59 AM
Share

पाटणा : बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल ((Bihar Election Result 2020) जाहीर होण्यासाठी आता काही तासच उरले आहे. यामध्ये बिहारच्या जनतेचं भविष्य कोणाच्या हातामध्ये असणार याची प्रत्येकाला चिंता लागून आहे. निवडणुका झाल्या, निकालही लागणार असले तरी बिहारमध्ये अनेक मोठ्या समस्या असणार आहेत. जाणून घेऊयात नेमक्या काय आहे बिहारवासीयांच्या समस्या. (Bihar Election 2020 bihar be able to get rid of these problems)

लालू प्रसाद यादव यांनी 1990 ला मंडळ आयोगाला हत्यार बनवून बिहारची सत्ता हस्तगत केली. त्यावेळी भारतातील दरडोई उत्पन्न 6270 रुपये होतं आणि बिहारमध्ये दरडोई उत्पन्न 2660 रुपये होतं. म्हणजेच बिहारमधील दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या सुमारे 42 टक्के होतं. यावेळी तब्बल तीन दशकांनंतर म्हणजेच 30 वर्षांनंतर बिहारमध्ये स्थिर सरकार पाहायला मिळालं. मागची 30 वर्षे म्हणजेच 1960 ते 1990 च्या दरम्यान बिहारमध्ये 25 मुख्यमंत्री होऊन गेले. चार वेळा राष्ट्रपती राजवट होती. त्यामुळे बिहारच्या जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला.

आरक्षणासाठी जनतेनं ठेवला लालू यादव यांच्यावर विश्वास आरक्षण मिळावं यासाठी बिहारच्या जनतेनं लालू यादव यांच्यावर विश्वास ठेवला. पण 15 वर्षांत लालू यादव यांनी कोणतीही काम केली नाहीत. त्यांची पत्नी राबड़ी देवी यांच्या कार्यकाळातही बिहारमध्ये दरडोई उत्पन्नात कोणतीही वाढ झाली नाही.

बिहारमधील समस्या

– बिहारचे नागरिक विकासापासून लांबच राहिले.

– बिहारमधील दरडोई उत्पन्न देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या 27 टक्के होतं.

– देशातील साक्षरतेच्या दरामध्ये बिहारमध्ये 1981 ला सुमारे 12 टक्के फरक होता आणि हा फरक 1991 मध्ये जास्त दिसून आला.

– लालू यादव यांचं सरकार स्थापन झालं, तेव्हा देश आणि राज्यातील साक्षरतेच्या दरीतील फरक 18 टक्क्यांहून अधिक होता, परंतु नितीश सरकारच्या काळात साक्षरतेचा दर आलेख वाढला आणि बिहार आणि देशाच्या साक्षरतेच्या दरामधील फरक कमी झाला.

– बिहारमधील जीडीपी वाढीचा दर 1993-94 ते 2004-05 दरम्यान सुमारे 5% होता, जो भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूपच कमी होता.

– बिहारला आरोग्याचाही मोठा प्रश्न आहे.

– अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बिहार राजस्थानपेक्षा पुढे होता. परंतु गेल्या 30 वर्षात राजस्थानची अर्थव्यवस्था बिहारपेक्षा दुप्पट झाली आहे.

– बिहारमध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त

– बिहारमध्ये शेतीविषय समस्या आहेत

इतर बातम्या – 

Bihar Election Result Live Update: बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर, सामनामधून तेजस्वी यादव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Bihar Election Result : निकालाआधीच पोस्टर झळकण्यास सुरुवात, तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख

(Bihar Election 2020 bihar be able to get rid of these problems)

Follow Us
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.