“देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन”, बिहारमध्ये अनेक जागी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला निलेश राणेंचा टोला

भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे.

देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं अभिनंदन, बिहारमध्ये अनेक जागी नोटापेक्षाही कमी मतं मिळालेल्या शिवसेनेला निलेश राणेंचा टोला
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 10:41 AM

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजपच्या राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी सुरु केली आहे. बिहारमध्ये शिवसेनेनं लढवलेल्या 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. त्यावरुन भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलाय. सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेना मोठ्या हिरीरीने बिहार विधानसभा निवडणूक रिंगणात उतरली होती. पण शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या पराजयाचा सामना करावा लागला आहे. (Rane brothers criticize Shiv Sena’s performance in Bihar assembly elections)

निलेश राणे यांनी काही मतदारसंघात शिवसेनेला मिळालेल्या मतांची आकडेवारी ट्वीट करत शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारमधील निवडणुकीत शिवसेनेची धमाकेदार कामगिरी असं लिहीत, ‘वारंवार देशात स्वत:चा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन’ अशी उपरोधिक टीका निलेश राणे यांनी केली आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही शिवसेनेवर चांगलाच हल्ला चढवला. “बिहारमधील मुस्लिमबहुल भागात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचं दिसतं तर त्या ठिकाणी भाजप उमेदवारांना चांगली मतं मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. हा महाराष्ट्र इफेक्ट आहे का? महाराष्ट्रात शिवसेनेसोबत गेल्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर आपली व्होट बँक गमवावी लागत आहे”, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

नितेश राणे यांनी एक चार्ट ट्वीट करत काँग्रेसला पारंपरिक मतांमध्ये बसलेला फटका दाखवला आहे. तो दाखवताना राणे यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

कोणत्या मतदारसंघात शिवसेनेला मोठा दणका?

पालिगंज गया शहर वझीरगंज चिरैया मानेर फुलपरेश राघोपूर बेनिपूर मधुबनी तरैया अस्तवा औरिया कल्याणपूर बानमंखी ठाकूरगंज समस्तीपूर सराई मोरवा किशनगंज बहादूरगंज नरपतगंज मनिहारी

2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतील शिवसेनेची कामगिरी

  • शिवसेनेने लढवलेल्या एकूण जागा – 80/243
  • एकूण मिळालेली मते – 2 लाख 11 हजार 131
  • तिसऱ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 07 (जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब, मोरवा, हयाघाट, दिनारा, बोचहा)
  • चौथ्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 02 (भमुआ, मनिहारी)
  • पाचव्या क्रमांकावरील एकूण उमेदवार – 01 (बलरामपूर)
  • एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मतं मिळाली होती. यापैकी तीन जागांवर शिवसेनेने घेतलेल्या निर्णायक मतांमुळे भाजप उमेदवार पराभूत झाले होते.
  • शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम पक्षापेक्षा अधिक मतं मिळाली होती (राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतं – 1 लाख 85 हजार 437, एमआयएमला मिळालेली मतं – 80 हजार 248)

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

बिहारमध्ये शिवसेनेचं डिपॉझिटच जप्त; आता कुठे गेला उद्धव ठाकरे आणि राऊतांचा चमत्कार: किरीट सोमय्या

Rane brothers criticize Shiv Sena’s performance in Bihar assembly elections

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.