AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election: बिहारमध्ये ‘हे’ नेते ठरले औटघटकेचे मुख्यमंत्री; पाच दिवसांत पडले सरकार

आतापर्यंत बिहारमध्ये एकूण 23 नेते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यापैकी केवळ 13 जणांनाच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहता आले. | Bihar CM

Bihar Election: बिहारमध्ये 'हे' नेते ठरले औटघटकेचे मुख्यमंत्री; पाच दिवसांत पडले सरकार
| Updated on: Nov 10, 2020 | 9:50 AM
Share

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून थोड्यावेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरून बिहारमध्ये त्रिशंकू परिस्थिती उद्भवली तर काय होणार, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय नाट्य रंगणार का? विरोधी पक्षातील नेते फोडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न होणार का, याचे उत्तर आगामी काळच देईल. (shortest term chief ministers in Bihar)

बिहारच्या जनतेने आतापर्यंत जवळपास 12 मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ अनुभवला आहे. यापैकी काहीजणांनी आपली टर्म पूर्ण केली तर काहीजण औटघटकेचे मुख्यमंत्री ठरले. बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे पहिल्या टर्ममध्ये केवळ सात दिवसांसाठी मुख्यमंत्री होते. मात्र, अशी दुर्दैवी वेळ आलेले नितीश कुमार हे बिहारमधील एकमेव नेते नाहीत.

आतापर्यंत बिहारमध्ये एकूण 23 नेते मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते. मात्र, त्यापैकी केवळ 13 जणांनाच सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहता आले. उर्वरित 10 नेत्यांना फार थोडा काळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसता आले.

यामध्ये संयुक्त सोशालिस्ट पक्षाचे नेते सतीश प्रसाद सिंह यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 1967 साली सतीश प्रसाद मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, त्यांचे सरकार केवळ पाच दिवस टिकले. त्याकाळी प्रचंड ताकदवान असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे बिहारमध्ये पहिल्यांदाच महामाया प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली बिगरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले.

मात्र, हे सरकार एक वर्षही टिकले नाही. यानंतर सतीश प्रसाद सिंह हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, पाच दिवसांतच त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यात आले. त्याऐवजी सतीश प्रसाद सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.

नितीश कुमार यांनादेखील पहिल्यावेळी सात दिवसच मुख्यमंत्री राहता आले. मात्र, नंतरच्या काळात नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, सतीश प्रसाद यांना पुन्हा मुख्यमंत्री होताच आले नाही. त्यामुळे सतीश प्रसाद यादव यांच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. याशिवाय, काँग्रेस नेते दीप नारायण सिंह यांच्या नावावरही अशाच विक्रमाची नोंद आहे. ते केवळ 18 दिवस बिहारचे मुख्यमंत्री होते.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 LIVE | महागठबंधनने बहुमताचा आकडा गाठला, भाजप दुसरा मोठा पक्ष

Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादवांसाठी शुभशकुन? समर्थक मासे घेऊन घराबाहेर

Nitish Kumar LIVE News and Updates: बिहारमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार NDA ची अखेर शंभरी पार, नितीश कुमार यांचा JDU तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची शक्यता

(shortest term chief ministers in Bihar)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.