AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घामातून शेतकऱ्यांनी पिकवले मोती..भाजपने अन्नधात्यांचा नाही ठेवला मान..

भाजपला या सत्तेत बाजूला करुन आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करू असा विश्वास शरद पवारांनी दिला.

घामातून शेतकऱ्यांनी पिकवले मोती..भाजपने अन्नधात्यांचा नाही ठेवला मान..
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 26, 2022 | 8:07 AM
Share

हरियाणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी (Bihar CM Nitish Kumar) हरियाणातील फतेहाबादमध्ये विरोधकांची मोट बांधत भाजपवर जोरदार निशाणा साधला. या सभेसाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी उपस्थित लावत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून केंद्रातील मोदी सरकारवर चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेले अश्वासन अद्याप पूर्ण करणयात आले नाही.

ज्या शेतकऱ्यांना अश्वासन देण्यात आले त्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र या भाजप सरकारने केले असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.

या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले की, एक काळ असा होता की देशात अन्नधान्य नव्हते. त्यावेळी शेतकऱ्यांनी रक्त आणि घाम गाळून देशातील ही परिस्थिती बदलली.

जगात अन्नधान्य उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यामागे केवळ आपल्या शेतकऱ्यांचीच मेहनत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांविषय बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवरही त्यानी भाष्य केले. देशातील अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील एका शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सांगितले की, मी बँकेकडून कर्ज घेतले होते.

मात्र आता मी बँकेचे कर्ज फेडू शकत नाही, आणि सरकारनेही माझे कर्ज माफ केले नाही. त्यामुळे मला आत्महत्या करण्यास भाग पडले असल्याचे सांगत केंद्र सरकारच्या कार्यशैलीवर त्यांनी बोट ठेवले.

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी बोलताना म्हणाले की, यानिमित्ताने मी शेतकऱ्यांना वचन देतो की, कर्जबाजारीपणामुळे एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज नाही. कारण आता आम्ही सर्व मिळून या सरकारमध्ये बदल घडवून आणू शकतो.

भाजपला या सत्तेत बाजूला करुन आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना त्यांनी दिला.

आज देशावर महागाईचे,बेरोजगारीचे संकट आहे, पण त्याकडे हे सरकार जाणीवपूर्वक लक्ष कोणी देत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

माजी उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त रविवारी हरियाणातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते. हरियाणातील ओमप्रकाश चौटाला यांनी या नेत्यांना मेळाव्याचे निमंत्रण दिले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयू नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आरजेडी नेते आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल आणि सीपीआयएम नेते सीताराम येचुरी यांची उपस्थिती होती.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच