AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जल्लोष आहे देशाचा, कारण वाढदिवस आहे मोदींचा; या दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मिळणार ‘ही’ मौल्यवान गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे.

जल्लोष आहे देशाचा, कारण वाढदिवस आहे मोदींचा; या दिवशी जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मिळणार 'ही' मौल्यवान गोष्ट
| Updated on: Sep 16, 2022 | 3:37 PM
Share

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendr Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस (Brithday) आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून तामिळनाडूमध्ये नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे.

याबरोबरच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमार्फत 720 किलो मासळी वाटप केली जाणार आहे.

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपकडून चेन्नईतील आरएसएस रुग्णालयाची निवड केली आहे.

या रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत 5 हजार रुपये असणार आहे.

नवजात बालकांना सोन्याची अंगठी वाटप केले जाण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 720 किलोग्रॅम मासळी वाटली जाणार आहे.

यावेळी मंत्री मुरुगन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.

नरेंद्र या वाढदिवसाबरोबरच महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्तही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.