AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना वेळ न घालवता भरपाई द्या, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारांना आदेश!

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला आदेश देत म्हटले आहे की, आता अजिबात वेळ न घालता लगेचच कारवाई करून संबंधितांना भरपाई द्यावी. इतकेच नाही तर ज्यांनी तक्रार केल्या आहेत, त्यावर चार आठवड्यामध्ये निर्णय द्यावा. आंध्र प्रदेशमधील एका याचिकेवर सोमवारी ही सुनावणी न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरला यांनी केली.

Corona | कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना वेळ न घालवता भरपाई द्या, सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारांना आदेश!
Image Credit source: istockphoto.com
| Updated on: Jul 19, 2022 | 8:42 AM
Share

मुंबई : देशामध्ये साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी कोरोनाने (Corona) हाहा:कार माजवला होता. अनेकांना कोरोनाची लागण झाली तर कोरोनाने अनेकांचा बळी देखील घेतला. आता सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या कमी आहे. मात्र, कोरोनामुळे होणारे मृत्यू (Death) सुरूच असल्याचे आकडेवारीवरून पुढे येते. कोरोनाच्या काळात आर्थिक स्थिती खराब झाली. कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू अध्यापही मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत पोहचली नसल्याचे समोर आले. आता सर्वोच्च न्यायालयानेच राज्य सरकारला या कुटुंबियांना लगेचच मदत करण्याचे आदेश (Order) दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला आदेश देत म्हटले आहे की, आता अजिबात वेळ न घालता लगेचच कारवाई करून संबंधितांना भरपाई द्यावी. इतकेच नाही तर ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यावर चार आठवड्यामध्ये निर्णय द्यावा. आंध्र प्रदेशमधील एका याचिकेवर सोमवारी ही सुनावणी न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरला यांनी केली. सर्व यंत्रणांनी कामाला लागून आदेशाचे पालन करावे आणि पात्र कुटुंबियांना भरपाई द्यावी, असे आदेश खंडपीठाने राज्यांना दिले आहेत.

आंध्र प्रदेशमधील एका याचिकेवर सोमवारी सुनावणी

कोरोनामुळे देशात आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 2,00,30,31,493 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी 1,01,92,35,345 जणांना पहिला तर 92,64,60,722 जणांना दुसरा डोस मिळाला. मात्र, केवळ 5,73,35,426 बूस्टर डोस वापरले गेले आहेत. वाढत्या लसीकरणामध्ये बूस्टर डोसची संख्या कमी होण्याची अनेक कारणे आहेत. तिसऱ्या डोसबाबत तज्ज्ञांची मतेही वेगळी आहेत. दीड वर्षांपूर्वी देशात कोरोनाने कहर केला होता. मात्र, लसीकरण मोहिमनंतर देशात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....