AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा दिला जातोय.

Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक
| Updated on: Dec 07, 2020 | 5:07 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) पारित केलेल्या 3 कृषी विधेयकावरुन (Farm Ordinances) देशभरात रान पेटलं आहे. देशातील विविध राज्यातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी (Farmers Protest) दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकांवरुन 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. क्रीडा क्षेत्रही याबाबतीत मागे राहिले नाही. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकाचा निषेध म्हणून खेळाडूंनी आपल्याला देण्यात आलेले पुरस्कार परत करण्यासाठी तसेच आंदोलन करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले. मात्र या सर्व खेळाडूंची पोलिसांनी अडवणूक केली. Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी करणारे खेळाडू हे पंजाब आणि इतर राज्यातील आहेत. या एकूण 30 जणांमध्ये आजी आणि माजी खेळाडूंचा समावेश आहे. पैलवान करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “30 खेळाडू आंदोनल करत राष्ट्रपतींना पुरस्कार परत करण्यासाठी जात आहेत. मात्र पंजाब आणि इतर खेळाडूंना पण पुरस्कार वापसी करायची आहे”.

मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा पुढाकार

कृषी विधेयकांविरोधात पुरस्कार वापसीच्या या प्रकारची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली. सर्वात आधी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार परत केला. यानंतर काही लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.

बॉक्सर विजेंदर सिंह दिवसांपूर्वी (Boxer Vijender Singh) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सिंधु बॉर्डरवर पोहचला. केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले नाहीत, तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत करणार, अशा इशारा विजेंदरने दिला. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

8 डिसेंबरला भारत बंदची हाक

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात 8 डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदला बऱ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला नेटीझन्सकडूनही मोठ्या प्रमाणात पांठिबा दिला जात आहे. आतापर्यंत सरकार आण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत 5 वेळा चर्चा करण्यात आली. मात्र यातून केंद्र सरकारला तोडगा काढण्यात यश आलं नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी ( 8 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद असणार आहे. यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळ आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.