AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा दिला जातोय.

Farmers Protest | क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक
| Updated on: Dec 07, 2020 | 5:07 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) पारित केलेल्या 3 कृषी विधेयकावरुन (Farm Ordinances) देशभरात रान पेटलं आहे. देशातील विविध राज्यातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी (Farmers Protest) दाखल झाले आहेत. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकांवरुन 8 डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. क्रीडा क्षेत्रही याबाबतीत मागे राहिले नाही. केंद्र सरकारच्या या कृषी विधेयकाचा निषेध म्हणून खेळाडूंनी आपल्याला देण्यात आलेले पुरस्कार परत करण्यासाठी तसेच आंदोलन करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने निघाले. मात्र या सर्व खेळाडूंची पोलिसांनी अडवणूक केली. Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुरस्कार वापसी करणारे खेळाडू हे पंजाब आणि इतर राज्यातील आहेत. या एकूण 30 जणांमध्ये आजी आणि माजी खेळाडूंचा समावेश आहे. पैलवान करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, “30 खेळाडू आंदोनल करत राष्ट्रपतींना पुरस्कार परत करण्यासाठी जात आहेत. मात्र पंजाब आणि इतर खेळाडूंना पण पुरस्कार वापसी करायची आहे”.

मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचा पुढाकार

कृषी विधेयकांविरोधात पुरस्कार वापसीच्या या प्रकारची सुरुवात काही दिवसांपूर्वीच झाली. सर्वात आधी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार परत केला. यानंतर काही लेखकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.

बॉक्सर विजेंदर सिंह दिवसांपूर्वी (Boxer Vijender Singh) शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सिंधु बॉर्डरवर पोहचला. केंद्र सरकारने विधेयक मागे घेतले नाहीत, तर राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार (Rajiv Gandhi Khel Ratna Award) परत करणार, अशा इशारा विजेंदरने दिला. विजेंदरने काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती.

8 डिसेंबरला भारत बंदची हाक

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात 8 डिसेंबरला भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदला बऱ्याच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला नेटीझन्सकडूनही मोठ्या प्रमाणात पांठिबा दिला जात आहे. आतापर्यंत सरकार आण शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत 5 वेळा चर्चा करण्यात आली. मात्र यातून केंद्र सरकारला तोडगा काढण्यात यश आलं नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान उद्या मंगळवारी ( 8 नोव्हेंबर) सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत भारत बंद असणार आहे. यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळ आणि सरकारमध्ये पुन्हा चर्चा केली जाणार आहे.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंह

Delhi Police stop sportspersons who were marching towards Rashtrapati Bhavan to return their awards

Follow Us
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे