AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरमालकांनी भाडं मागू नये, अन्यथा 2 वर्षांचा तुरुंगवास, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोणत्याही मजुराकडून आणि कर्मचाऱ्याकडून पुढील 1 महिना भाडं मागू नये, असे आदेश नोएडाचे जिल्हाधिकारी बी. एन. सिंह यांनी दिले आहेत (Order to not demand rent amid Corona).

घरमालकांनी भाडं मागू नये, अन्यथा 2 वर्षांचा तुरुंगवास, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
| Updated on: Mar 29, 2020 | 5:00 PM
Share

लखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर रोजदांरीवर काम करुन उपजीविका करणाऱ्या मजुरांचे गंभीर प्रश्न तयार झाले आहेत. रोजगारानिमित्त भाडे देऊन राहणाऱ्या मजुरांना दररोजचं जेवण आणि भाडे भरणेही अशक्य होत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या मजुरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मजुराकडून आणि कर्मचाऱ्याकडून पुढील 1 महिना भाडं मागू नये, असे आदेश नोएडाचे जिल्हाधिकारी बी. एन. सिंह यांनी दिले आहेत (Order to not demand rent amid Corona). जो घरमालक भाडेकरुंकडून भाड्याची मागणी करेल त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी बी. एन. सिंह म्हटले आहे, “सर्व घरमालकांनी आपल्या येथे राहणाऱ्या मजूर आणि कामगारा भाडेकरुंकडून भाडं वसूल करु नये. जर कोणत्याही घरमालकाविरोधात जबरदस्ती भाडे मागितल्याची तक्रा आली, तर त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या अंतर्गत 2 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास देखील होऊ शकतो.”

आदेशांचं पालन न करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध कायदा 2005 च्या कलम 51 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. यानुसार दोषींना 1 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो. आदेशाचं उल्लंघन करताना जर जीवित किंवा वित्तहानी झाली, तर दोषींना 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. हा आदेश केवळ एक महिन्यांसाठी भाडे न मागण्याबाबत आहे. त्यापुढील निर्णय 1 महिन्यानंतर असलेल्या स्थितीवर घेतला जाणार आहे. या निर्णयाने हातावर पोट भरणाऱ्या भाडेकरुंना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर अशा स्थितीत गावाकडे जाण्याची नामुष्कीही येणार नाही.

नोएडामधील घरमालकांनी देखील या आदेशाला अनुकुल प्रतिसाद दिला आहे. त्याचं म्हणणं आहे की, “आमच्या 50 खोल्या भाड्याने दिलेल्या आहेत. त्यामुळे जर 1-2 महिने भाडं मिळालं नाही, तर आम्हाला पार नुकसान होणार नाही. आम्ही या संकटाच्या काळात देशासोबत आहोत. आम्ही आमच्या भाडेकरुंना घरं सोडून जाऊ नका, असं सांगितलं आहे. जर त्यांना कशाची गरज पडली तर आम्ही त्याची व्यवस्था करु.”

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका नोएडाला बसला आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 50 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण नोएडामध्ये आहेत. उत्तर प्रदेशमधील 75 पैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाचं थैमान सुरुच, महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 193 वर

कर्मचाऱ्यांच्या मनात कोरोनाची भीती, पाठीवर पंप घेवून नगराध्यक्ष स्वत:च निर्जंतूक फवारणीच्या कामाला

VIDEO: टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा ‘DSP’ रस्त्यावर, काही वेळातच शहर लॉकडाऊन

संबंधित व्हिडीओ:

Order to not demand rent amid Corona

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.