AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार

पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे, पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. अशी देखील काही झाडं असतात, जी त्यांच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

ही वनस्पती घराजवळ लावूच नका, पावसाळ्यात असतं सापांचं सर्वात आवडतं ठिकाण, परिसरात कायम सापं दिसणार
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 9:10 PM
Share

उन्हाळा आता संपत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये देशासह राज्यात आता मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा हा तसा अल्हादायक ऋतु असतो. या काळात सर्वत्र हिरवळ असते. निसर्ग हिरव्या रंगानं न्हाऊन निघतो. याच काळात अनेक जण ट्रेकला जाण्याचे किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्याचे, पावसात मनसोक्त भिजण्याचे प्लॅन बनवतात. तसेच मान्सूनच्या आगमनाबरोबरच खरीप हंगामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील आपल्या कामात व्यस्त होतो. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष सध्या मान्सूच्या आगमनाकडे लागलं आहे. मात्र या काळात आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. वेळेत उपचार न मिळाल्यानं अशा घटनांमध्ये काही जणांचा मृत्यू देखील होतो. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ का होते? तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी जातं, सांपाच्या बिळात पाणी गेल्यानंतर ते बिळातून बाहेर पडतात. अनेकदा असं देखील होतं की जर जोरदार पाऊस झाला तर सापांची बिळं मातीमुळे बुजली जातात. त्यामुळे देखील साप रस्त्यावर फिरतात आणि सर्पदंशाचा धोका वाढतो.

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची दोन मुख्य कारणं आहेत, ती म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडल्यामुळे शेतात गार्डन आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढते. शेतातील पीक देखील वाढलेली असतात. अनेकदा अशा ठिकाणी साप लपून बसतात. वाढलेल्या गवतामुळे आपल्याला सापांचा अंदाज येत नाही आणि त्यांच्यावर पाय पडला किंवा त्यांना धोका जणावला की ते तुम्हाला दंश करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी घुसतं, अशावेळी साप बिळातून बाहेर पडतात, ते आश्रयासाठी सुरक्षित अंधाऱ्या पंरतु कोरड्या जागेचा शोध घेतात. त्यांना जर अशी जागा तुमच्या घरात सापडली तर ते तुमच्या घरात प्रवेश करतात. अशा स्थितीमध्ये तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो. या ठिकाणी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर तुम्हाला कुठे साप दिसलाच तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्या. ते सापांना रेस्क्यू करतील.

आता आपण अशा एका झाडाची माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या विशिष्ट गुणांमुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. हे झाड आहे, खाण्याच्या पानाचं ज्याला आपण नागिणीच्या पानाचा वेल असं देखील म्हणतो. हा वेल मोठ्या प्रमाणात वाढतो. सर्व जमिनतीवर किंवा घरावर पसरतो. या ठिकाणी अडचण निर्माण होते, त्यामुळे या वेलीखाली लपण्यासाठी सापांना सुरक्षित जागा सापडते. तसेच या वेलीच्या पानाचा आकार हा मोठा असल्यामुळे पानाखालची जमीन देखील भिजत नाही, त्यामुळे साप या झाडाला पावसाळ्यात आपलं घर बनवतात. अनेकदा अशा झाडांखाली साप आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्यात हे झाडं कधीही घरात शेजारी लावू नये, असं मानलं जातं.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.