AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरातील धाडसत्राचे पीओकेत पडसाद..खोऱ्यातील दहशतवाद्याचे नेटवर्क हादरले

भारतातील या कारवाईमुळे कॅनडा, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संघटनांच्या प्रमुखांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

देशभरातील धाडसत्राचे पीओकेत पडसाद..खोऱ्यातील दहशतवाद्याचे नेटवर्क हादरले
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Sep 22, 2022 | 9:57 PM
Share

नवी दिल्लीः अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) विरुद्ध केलेल्या संयुक्त कारवाईने गुरुवारी देशभर खळबळ माजली. भारतातील विविध 10 ते 11 राज्यांमध्ये असलेल्या पीएफआयवर छापे टाकून कारवाई सुरवात करण्यात आली आहे. तर पाकिस्तानसह परदेशात असलेल्या पीएफआय प्रमुखांची अवस्था आता बिकट झाली आहे. कारण या छाप्यांमध्ये ईडी आणि एनआयएकडून महत्त्वाची कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली आहे.

त्याबरोबरच पुरावे-साक्षीदार पकडण्यात आले आहेत. त्यामुळे आता या संघटनेवर ठोस कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची पाळंमुळं खरं तर 2005 पासूनच भारतात पसरण्यास सुरुवात झाली होती. तर यामध्ये प्रामुख्याने बांगलादेश, पाकिस्तान आणि कॅनडात असलेली अनेक लोकं भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होती.

त्याच आधारे भारतात सध्या असलेल्या पीएफआयकडून देशद्रोही संघटना विकत घेऊन अशांतता पसरवण्याचे मुख्य काम करण्यात येत होते.

रातोरात गलेलठ्ठ बनण्याच्या जाळ्यात अडकलेल्या पीएफआयला घरी बसून बक्कळ पैसे कमवण्याचा हा मार्ग सोपा आणि जलद होता. त्यामुळे ते स्वतः परदेशात असलेल्या भारतविरोधी कारवाई करणाऱ्या शक्तींच्या समर्थनात ते होते.

भारताविरोधी कारवाया करताना पीएफआय आणि परदेशात बसून पैशांच्या जोरावर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे लोक कोणत्याही प्रकारे त्यांचे नाव थेट भारतीय तपास यंत्रणांच्या नजरेत कधीही जाणार नाही याची विशेष काळजी घेतली जात होती.

कारण अशा संघटनांना माहिती होते की, अशा एजन्सींवर थेट कारवाया करण्यासाठी भारतीय तपासय यंत्रणा कधीही मागे हटणार नाहीत.

त्यामुळेच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडूनही काही काळातच अनेक पीएफआयच्या तळांवर छापे टाकण्यात आले होते. त्यातील अनेकांवर कारवाई करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले होते.

ईडी आणि एनआयएने संयुक्तपणे गुरुवारी देशातील 10-11 राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले त्याच वेळी भारतीय तपास यंत्रणांनी सिद्ध केले की अशा संघटना असतील तर त्यांच्याविरोधात कारवाई करायला भारतीय तपास यंत्रणांना वेळ लागत नाही.

आतापर्यंत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून देशातील पीएफआय तळांवर सर्वाधिक छापे टाकले गेले आहेत. गुरुवारी भारतात 10-11 राज्यांमधील पीएफआय तळांवर छापे टाकले गेले. मात्र परदेशातील काही जण लपून बसले आहेत.

भारतातील या कारवाईमुळे कॅनडा, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संघटनांच्या प्रमुखांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Follow Us
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?