AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु

भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे.

लवकरच कुठूनही मतदान करण्याचा हक्क मिळणार? कसा? चाचपणी सुरु
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 25, 2021 | 9:27 AM
Share

नवी दिल्ली  :  आपल्याला जर मतदान करायचं असेल तर ज्या मतदारसंघात आपलं नाव आहे किंवा नोंदणी आहे तिथे जाऊन आपल्याला मतदान करावं लागतं. यामध्ये नोकरी करणाऱ्यांना किंवा कामानिमित्त बऱ्याच वेळा बाहेर असणाऱ्या मतदारांना मतदान करणं जमतं असं नाहीच. मात्र आता भारतीय निवडणूक आयोग एक महत्तपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर जाऊन मतदारांना मतदान करता येणं शक्य आहे का?, याची चाचपणी सध्या निवडणूक आयोग करत आहे. (Election Commission trial To Vote From Any Centre )

देशातील कोणत्याही मतदानकेंद्रावर जाऊन मतदाराला आपलं मत नोंदवता येण्यासाठी भारताच्या निवडणूक आयोगाचं काम सुरु आहे किंबहुना त्याची ट्रायल सुरु असल्याचं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला सुनील अरोरा यांनी भविष्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा दृष्टीकोन देशवासियांच्या समोर ठेवला.

आम्ही आयआयटी-मद्रास आणि इतर संस्थांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रिमोट वोटिंग संधोधन प्रकल्प सुरु केला आहे. आमचा हा प्रकल्प प्रगतीपथावर असून त्याची ट्रायलही सुरु झाल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.

प्रत्येक निवडणुकीत हजारो लोकांना भौगोलिक अडथळ्यामुळे, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार किंवा इतर कारणांमुळे नोंद असलेल्या मतदारसंघात जाता येत नाही. अशा मतदारासांसाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय संजीवनी ठरणार आहे. देशातील लाखो मतदारांना याचा फायदा होणार आहे. जर देशातील कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करण्याचा अधिकार बजावता आला, तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान ओळखपत्र आता मोबाईलवर

भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली. याचं दिनाचं औचित्य साधून निवडणूक आयोग दरवर्षी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करतो. आजपासून (सोमवार) भारत निवडणूक आयोगाचे ई मतदार ओळखपत्र (ई ईपिक) वाटप सुरु होणार असून मतदारांना त्यांचे ओळखपत्र मोबाईल अथवा संगणकावर डाऊनलोड करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त बलदेस सिंह यांनी दिली. (Election Commission trial To Vote From Any Centre )

हे ही वाचा

मतदानाला जाताना निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नाही? ‘हे’ आहेत पर्याय

‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत, राहुल गांधींचा आरएसएसवर हल्ला

अशोक चव्हाणांना सोळा नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे वेध?

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.