AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FASTag: फास्टॅग नसला तर दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही, ‘या’ परिस्थितीत फुकट प्रवास करता येणार

FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही.

FASTag: फास्टॅग नसला तर दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही, 'या' परिस्थितीत फुकट प्रवास करता येणार
FASTag
| Updated on: Oct 04, 2025 | 8:59 PM
Share

वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. FASTag च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. 15 नोव्हेंबरपासून जर तुमच्या वाहनात सक्रीय फास्टॅग नसेल किंवा फास्टॅगकाम करत नसेल, तर तुम्हाला दुप्पट रक्कम भरावी लागणार नाही. अशा परिस्थितीत आता तुम्हाला UPI द्वारे 1.25 पट टोल टॅक्स भरावा लागेल. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या FASTag नसलेल्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो.

समोर आलेल्या माहितीनुसार सध्या 98% टोल फास्टॅगद्वारे वसूल केले जातो. ज्या वाहनांचा फास्टॅग सक्रीय नसेल किंवा काम करत नसेल तर पूर्वी दुप्पट टोल भरावा लागत होता. मात्र आता युपीआयद्वारे 1.25 पट टोल भरावा लागणार आहे. तसेच जर तुमचा फास्टॅग सक्रीय असेल मात्क टोल प्लाझा मशीनमध्ये अडचण निर्माण झाल्यास तुम्ही फुकटात टोल ओलांडू शकता. तुम्हाला टोलवर थांबण्याची किंवा टोल भरण्याची गरज नाही.

वाहनचालकांचे पैसे वाचणार

तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला आता UPI द्वारे टोल शुल्काच्या फक्त 1.25 पट रक्कम भरावी लागेल. उदाहरणार्थ, जर टोल 100 रुपये असेल तर आणि तुमचा फास्टॅग काम करत नसेल तर तुम्हाला आधी रोख 200 रुपये द्यावे लागत होते. मात्र आता केवळ UPI द्वारे 125 रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे 75 रुपयांची बचत होईल. तसेच टोल प्लाझावर रोखीने होणारे व्यवहार आणखी कमी होतील आणि भ्रष्टाचारही कमी होईल.

15 नोव्हेंबरपासून नियम लागू होणार

फास्टॅगचा हा नवा नियम 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. तोपर्यंत अतिरिक्त दंड टाळण्यासाठी तुमच्या वाहनाचा FASTag तपासा आणि तो सक्रीय आहे याची खात्री करा. जर काही समस्या असेल तर ती दुरुस्त करा. यामुळे तुमचा प्रवास कमी पैशांमध्ये होईल.

टोल संकलनात वाढ

ऑगस्टमध्ये 7052.91 कोटी रुपयांचे टोल संकलन झाले होते. ही रक्कम मागील वर्षीच्या 5610.64 कोटींपेक्षा 26 टक्क्यांनी जास्त आहे. य़ाआधी मे 2025 मध्ये सर्वाधिक 7087.16 कोटींचा टोल वसूल झाला होता. जूनमध्ये हा आकडा 6700 कोटी रुपये होता. जुलैमध्ये 6500 कोटी रुपयांचा टोल जमा झाला होता.

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस