AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

"आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत", असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं (Health Ministry statement on Corona vaccine)

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
| Updated on: Dec 01, 2020 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली : “लस तयार करण्यासाठी साधारणपणे आठ ते दहा वर्ष लागतात. जास्त प्रयत्न केले तर लस तयार व्हायला कमीतकमी चार वर्ष लागतात. मात्र कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेऊन लस जास्तीत जास्त लवकर कशी तयार होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं आहे. ते मंगळवारी (1 डिसेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते (Health Ministry statement on Corona vaccine).

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या लसीची वाट बघत आहे. एखाद्या आजारावर लस तयार करण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 वर्ष लागतात. मात्र कोरोनाचा हाहा:कार पाहता जगभरातील अनेक देश लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतातही कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरु आहे. कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया जवळपास शेवटच्या टप्प्यावर आल्याचं बोललं जात आहे. कोरोना संकटाची भीषणता बघता भारतात 16 ते 18 महिन्यात लस विकसित करण्याचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवारा आहे. “पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावे”, असं आवाहन राजेश भूषण यांनी केलं आहे (Health Ministry statement on Corona vaccine).

भारतात आतापर्यंत 14 कोटी पेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी 6.69 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 11 नोव्हेंबरला हे प्रमाण 7.15 टक्के होतं. मात्र 1 डिसेंबर रोजी हे प्रमाण 6.9 टक्के इतकं आहे. मात्र, तरीही जगभरातील इतर देशांच्या तुलनेने भारतातील परिस्थिती बरी असल्याची प्रतिक्रिया राजेश भूषण यांनी दिली.

हेही वाचा :

सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचे आश्वासन दिलेच नव्हते: केंद्रीय आरोग्यमंत्रालय

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.