AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

"आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत", असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं (Health Ministry statement on Corona vaccine)

लस तयार करण्यासाठी 8 ते 10 वर्ष लागतात, कोरोनाची लस 18 महिन्यात तयार करतोय : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
| Updated on: Dec 01, 2020 | 8:26 PM
Share

नवी दिल्ली : “लस तयार करण्यासाठी साधारणपणे आठ ते दहा वर्ष लागतात. जास्त प्रयत्न केले तर लस तयार व्हायला कमीतकमी चार वर्ष लागतात. मात्र कोरोना संकटाची भीषणता लक्षात घेऊन लस जास्तीत जास्त लवकर कशी तयार होईल, यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. आम्ही 16 ते 18 महिन्यात लस तयार करत आहोत”, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं आहे. ते मंगळवारी (1 डिसेंबर) पत्रकार परिषदेत बोलत होते (Health Ministry statement on Corona vaccine).

संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या लसीची वाट बघत आहे. एखाद्या आजारावर लस तयार करण्यासाठी साधारणपणे 8 ते 10 वर्ष लागतात. मात्र कोरोनाचा हाहा:कार पाहता जगभरातील अनेक देश लस शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. भारतातही कोरोनावर लस तयार करण्याचं काम सुरु आहे. कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया जवळपास शेवटच्या टप्प्यावर आल्याचं बोललं जात आहे. कोरोना संकटाची भीषणता बघता भारतात 16 ते 18 महिन्यात लस विकसित करण्याचं ध्येय असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंता वाढवारा आहे. “पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं. त्याचबरोबर मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुवावे”, असं आवाहन राजेश भूषण यांनी केलं आहे (Health Ministry statement on Corona vaccine).

भारतात आतापर्यंत 14 कोटी पेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यापैकी 6.69 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 11 नोव्हेंबरला हे प्रमाण 7.15 टक्के होतं. मात्र 1 डिसेंबर रोजी हे प्रमाण 6.9 टक्के इतकं आहे. मात्र, तरीही जगभरातील इतर देशांच्या तुलनेने भारतातील परिस्थिती बरी असल्याची प्रतिक्रिया राजेश भूषण यांनी दिली.

हेही वाचा :

सरकारने संपूर्ण देशात लसीकरण करण्याचे आश्वासन दिलेच नव्हते: केंद्रीय आरोग्यमंत्रालय

Follow Us
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.