Explainer : युद्ध झालंच तर शत्रूपासून कसं वाचू शकतो? ब्लॅकआऊटचे नियम जाणून घ्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली असून त्यांनीही युद्धाची भाषा केली आहे. असं असताना या युद्धाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या ब्लॅकआऊटचाही समावेश आहे. याचे नियम काय आहेत? शत्रूपासून कसं वाचू शकतो? ते जाणून घ्या

भारताने पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीचा कायम दहशतवादाला खतपाणी देण्यासाठी वापर केला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी दहशतवादी तळ उभे केले असून भारताविरुद्ध विष काळवलं जात आहे. त्यात 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीही सौदी अरबचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. तसेच दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा दिला. गेल्या 15 दिवसांपासून याबाबत खलबतं सुरु होती. गृहमंत्रालयाकडून युद्धजन्य स्थितीचा आढावा घेतला जात होता. भारताने एक एक करत पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पहिल्यांदा सिंधू जल करार रद्द केला आणि पाणी बंद केलं. त्यानंतर नागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिलचं आयोजन केलं. पण हे मॉक ड्रील होण्याआधीच भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्यदलाने ही कारवाई केली. त्यामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भिकेला लागलेल्या पाकिस्तान आता...