AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत

चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत
india sri lanka help
| Updated on: Dec 02, 2025 | 8:54 AM
Share

दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे. यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने तातडीने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन सागर बंधु (Operation Sagar Bandhu) अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत ५३ टन मदतीचे साहित्य श्रीलंकेला पोहोचवण्यात आली आहे. तसेच या संकटात अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.

मदतीच्या किटमध्ये काय?

भारताने आधी शेजारी या धोरणातंर्गत आणि व्हिजन महासागरच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर रोजी हे व्यापक शोध, बचाव आणि मदत अभियान सुरू केले. यात भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांच्याद्वारे मदत पोहोचवण्यात आली. तसेच भारतीय वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट विमानेही मदत घेऊन कोलंबो आणि त्रिनकोमाली येथे पोहोचली. या मदतीमध्ये ९.५ टन आपत्कालीन रेशन, तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थ , औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ८० जणांची विशेष टीम तसेच ५ व्यक्तींचे वैद्यकीय पथक देखील श्रीलंकेत तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच आयएनएस विक्रांतचे चेतक हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेनेचे एमआय-१७ हेलिकॉप्टर्स श्रीलंकेच्या वायुसेनेसोबत मिळून मोठ्या प्रमाणावर बचाव अभियान राबवत आहेत. यात अनेक गर्भवती महिला, बालके आणि गंभीर जखमींसह अडकलेल्या लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढले जात आहे.

चक्रीवादळामुळे अडकलेले १५०० हून नागरिक मायदेशी परतले

या बचावलेल्या लोकांमध्ये श्रीलंका आणि भारताव्यतिरिक्त जर्मनी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, पोलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पथके पूरग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहे. त्यासोबतच स्थानिक कुटुंबांना मदतही दिली जात आहे. भारत आणि श्रीलंकेने केलेल्या या संयुक्त अभियानात आतापर्यंत १२१ हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

भारत या कठीण काळात श्रीलंकेचे सरकार आणि जनतेसोबत एकजुटीने उभे राहत असल्याने सर्व स्तरावरुन भारताचे कौतुक केले जात आहे. तसेच भारताकडून मिळालेल्या मदतीला पूर्ण पाठिंबा देऊ, असे श्रीलंकेने सांगितले आहे.

त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.