AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत

चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

Operation Sagar Bandhu : संकटात भारत श्रीलंकेच्या पाठिशी उभा राहिला, वाचवले हजारो लोकांचे प्राण, अशी सुरु आहे मदत
india sri lanka help
| Updated on: Dec 02, 2025 | 8:54 AM
Share

दित्वा चक्रीवादळामुळे श्रीलंकेला मोठा फटका बसला आहे. यामुळे श्रीलंकेचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताने तातडीने श्रीलंकेला मदतीचा हात पुढे केला आहे. ऑपरेशन सागर बंधु (Operation Sagar Bandhu) अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून हवाई आणि सागरी मार्गाने आतापर्यंत ५३ टन मदतीचे साहित्य श्रीलंकेला पोहोचवण्यात आली आहे. तसेच या संकटात अडकलेल्या १५०० हून अधिक भारतीय नागरिकांनाही सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे.

मदतीच्या किटमध्ये काय?

भारताने आधी शेजारी या धोरणातंर्गत आणि व्हिजन महासागरच्या मार्गदर्शनाखाली २८ नोव्हेंबर रोजी हे व्यापक शोध, बचाव आणि मदत अभियान सुरू केले. यात भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस विक्रांत, आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस सुकन्या यांच्याद्वारे मदत पोहोचवण्यात आली. तसेच भारतीय वायुसेनेच्या ट्रान्सपोर्ट विमानेही मदत घेऊन कोलंबो आणि त्रिनकोमाली येथे पोहोचली. या मदतीमध्ये ९.५ टन आपत्कालीन रेशन, तंबू, ब्लँकेट, स्वच्छता किट, तयार खाद्यपदार्थ , औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ८० जणांची विशेष टीम तसेच ५ व्यक्तींचे वैद्यकीय पथक देखील श्रीलंकेत तैनात करण्यात आले आहे. त्यासोबतच आयएनएस विक्रांतचे चेतक हेलिकॉप्टर्स आणि भारतीय वायुसेनेचे एमआय-१७ हेलिकॉप्टर्स श्रीलंकेच्या वायुसेनेसोबत मिळून मोठ्या प्रमाणावर बचाव अभियान राबवत आहेत. यात अनेक गर्भवती महिला, बालके आणि गंभीर जखमींसह अडकलेल्या लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढले जात आहे.

चक्रीवादळामुळे अडकलेले १५०० हून नागरिक मायदेशी परतले

या बचावलेल्या लोकांमध्ये श्रीलंका आणि भारताव्यतिरिक्त जर्मनी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, पोलंड, पाकिस्तान आणि बांगलादेशसह अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश आहे. एनडीआरएफची पथके पूरग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहे. त्यासोबतच स्थानिक कुटुंबांना मदतही दिली जात आहे. भारत आणि श्रीलंकेने केलेल्या या संयुक्त अभियानात आतापर्यंत १२१ हून अधिक लोकांना वाचवण्यात आले आहे. तसेच चक्रीवादळामुळे अडकलेल्या अंदाजे १५०० हून अधिक भारतीय नागरिकांना भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानांनी आणि व्यावसायिक विमानांनी सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यात आले.

भारत या कठीण काळात श्रीलंकेचे सरकार आणि जनतेसोबत एकजुटीने उभे राहत असल्याने सर्व स्तरावरुन भारताचे कौतुक केले जात आहे. तसेच भारताकडून मिळालेल्या मदतीला पूर्ण पाठिंबा देऊ, असे श्रीलंकेने सांगितले आहे.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.