AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! इराणचा भारताला जबरदस्त झटका, शत्रू प्रमाणे वागला, ऐन संकट काळात मित्राचा हात सोडला

इराणकडून नेहमीच भारत हा आपला मित्र असल्याचा उल्लेख करण्यात येतो. मात्र त्याच इराणने आत भारताला मोठा धक्का दिला आहे. ऐन संकट काळात इराणने आपल्या मित्राचा हात सोडल्याचं दिसून येत आहे.

मोठी बातमी! इराणचा भारताला जबरदस्त झटका, शत्रू प्रमाणे वागला, ऐन संकट काळात मित्राचा हात सोडला
iranImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 6:32 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे आखाती देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडली आहेत. त्यामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये भीषण इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. याची झळ काही प्रमाणात भारताला देखील बसली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान भारतानं आता कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची कमतरता भरून काढण्यासाठी पाऊलं उचलली आहेत. भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची निर्यात वाढली आहे. तर दुसरीकडे भारतानं इराणकडून देखील तेल खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र भारताला मोठा झटका बसला आहे.

मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. ही इंधन टंचाईची कोंडी फोडण्यासाठी आता अमेरिकेनं पुढाकार घेतला आहे. जगाला कच्च्या तेलाची विक्री करण्यासाठी आम्ही इराणला 30 दिवसांची सूट देऊ असं अमेरिकेनं म्हटलं होतं. या माध्यमातून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही बातमी समोर येताच भारतानं देखील इराणकडून कच्च्या तेलाच्या खरेदीची तयारी सुरू केली होती. मात्र इराणने भारतासह सर्वच देशांना मोठा झटका दिला आहे. विक्रिसाठी आमच्याकडे अतिरिक्त तेल नसल्याचं इराणने म्हटलं आहे.

इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मात्र तरी देखील ही आयात पुरेशी नसल्यानं भारतानं इराणकडून देखील कच्च्या तेलाच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र त्यातच आता इराणने मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना तेलाचा पुरवठा करण्यासाठी पुरेस तेल नसल्याचं इराणने म्हटलं आहे. भारत आपल्या गरजेच्या एकूण 90 टक्के कच्च तेल इतर देशांकडून आयात करतो, त्यामुळे आता हा भारतासाठी एक मोठा झटका मानला जात आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत