मोठी बातमी! इराणचा भारताला जबरदस्त झटका, शत्रू प्रमाणे वागला, ऐन संकट काळात मित्राचा हात सोडला
इराणकडून नेहमीच भारत हा आपला मित्र असल्याचा उल्लेख करण्यात येतो. मात्र त्याच इराणने आत भारताला मोठा धक्का दिला आहे. ऐन संकट काळात इराणने आपल्या मित्राचा हात सोडल्याचं दिसून येत आहे.

युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. या तणावामुळे आखाती देशातून होणाऱ्या कच्च्या तेलाचा पुरवठा ठप्प झाला आहे. इराणने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कच्च्या तेलाची वाहतूक करणारे अनेक जहाजं अडकून पडली आहेत. त्यामुळे सध्या जगातील अनेक देशांमध्ये भीषण इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. याची झळ काही प्रमाणात भारताला देखील बसली आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यानं अनेक हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान भारतानं आता कच्चं तेल आणि नॅचरल गॅसची कमतरता भरून काढण्यासाठी पाऊलं उचलली आहेत. भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची निर्यात वाढली आहे. तर दुसरीकडे भारतानं इराणकडून देखील तेल खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र भारताला मोठा झटका बसला आहे.
मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यामुळे जगभरात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. ही इंधन टंचाईची कोंडी फोडण्यासाठी आता अमेरिकेनं पुढाकार घेतला आहे. जगाला कच्च्या तेलाची विक्री करण्यासाठी आम्ही इराणला 30 दिवसांची सूट देऊ असं अमेरिकेनं म्हटलं होतं. या माध्यमातून वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र ही बातमी समोर येताच भारतानं देखील इराणकडून कच्च्या तेलाच्या खरेदीची तयारी सुरू केली होती. मात्र इराणने भारतासह सर्वच देशांना मोठा झटका दिला आहे. विक्रिसाठी आमच्याकडे अतिरिक्त तेल नसल्याचं इराणने म्हटलं आहे.
इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मात्र तरी देखील ही आयात पुरेशी नसल्यानं भारतानं इराणकडून देखील कच्च्या तेलाच्या खरेदीची तयारी सुरू केली आहे. मात्र त्यातच आता इराणने मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना तेलाचा पुरवठा करण्यासाठी पुरेस तेल नसल्याचं इराणने म्हटलं आहे. भारत आपल्या गरजेच्या एकूण 90 टक्के कच्च तेल इतर देशांकडून आयात करतो, त्यामुळे आता हा भारतासाठी एक मोठा झटका मानला जात आहे.
