Video: भारतातून पाकिस्तानला परतणारी महिला भावूक, म्हणाली, ‘त्यांना इस्लामबद्दल…’
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानला परतणाऱ्या एका महिलेने म्हटलं की, सामान्य लोकांना नाही तर फक्त दोषींनाच शिक्षा झाली पाहिजे. हल्ला करणाऱ्या व्यक्तीने कुराण वाचलेलं नाही...

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत, SVES व्हिसाखाली पाकिस्तानातून भारतात आलेल्या नागरिकांच्या परतीसाठी मोदी सरकारने कालावधी दिला. या संदर्भात, पाकिस्तानातून आपल्या मायदेशी परतणाऱ्या एका महिलेने वाघा बॉर्डरवर माध्यमांशी बोलताना मोठे विधान केलं आहे.
राजस्थानमधील जोधपूर येथील रहिवासी असलेल्या या महिलेचं लग्न पाकिस्तानात झालं होतं आणि ती तिच्या पतीसोबत भारतात आली होती. पण अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे महिलेला भारत सोडून पाकिस्तानात जावं लागत आहे.
पाकिस्तानात परतत असताना भावूक होत महिला म्हणाली, ‘जे झालं ते बिलकूल चांगलं झालेलं नाही. मी जोधपूर, राजस्थानमधून आहे आणि माझे पती पाकिस्तान येथील आहे. आम्ही 4 दिवसांनंतर परतणार होतो. पण कळलं तसं आम्ही तात्काळ देश सोडला आहे.’
#WATCH | Attari, Punjab: “Whatever happened is not right. I am from Jodhpur, Rajasthan and I am married in Pakistan. My husband is from Pakistan… We were going to return after 4 days, but we reached here as soon as possible when we came to know that we had to leave. Only the… pic.twitter.com/VHNlxwtYeF
— ANI (@ANI) April 25, 2025
महिला पुढे म्हणाली, ‘फक्त गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. सामान्य लोकांनी काय केलं आहे. आजारी आई – वडिलांना सोडून पाकिस्तानात परतावं लागतं आहे. दहशतवादी हल्ला कोणीही केला असेल, पण ते चुकीचं आहे. इस्लाम अशा गोष्टी शिकवत नाही. ज्या व्यक्तीने हे केलं त्याने कुराण वाचलेलं नाही आणि त्याला इस्लामचा अर्थही माहित नाही.’
सध्या वाघा सीमेवर अनेक इतर पाकिस्तानी नागरिकही उपस्थित आहेत, जे भारतात त्यांच्या नातेवाईकांना भेटून परतत होते. दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे.
SVES व्हिसा म्हणजे काय?
SVES व्हिसा हा एक विशेष प्रकारचा व्हिसा आहे जो सामान्यतः सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना विशिष्ट कालावधीसाठी एकमेकांच्या देशात जाण्याची आणि जाण्याची परवानगी देतो. दोन्ही देशांच्या नागरिकांना कौटुंबिक, सामाजिक किंवा मानवतावादी कारणांसाठी सहजपणे भेटण्याची संधी प्रदान करणं हा त्याचा उद्देश आहे. या व्हिसाखाली प्रवाशांना काही अटी आणि शर्तींचे पालन करावं लागतं आणि हा व्हिसा सामान्य व्हिसापेक्षा सोप्या प्रक्रियेद्वारे जारी केला जातो.
