AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir: हैदरपोरा चकमकीवरून राजकारण तापलं; निरपराधांना ठार केल्याचे आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीवरून वाद निर्माण झाला आहे. ठार झालेले दोन नागरिक हे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर मृतांच्या नातेवाईकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

Jammu Kashmir: हैदरपोरा चकमकीवरून राजकारण तापलं; निरपराधांना ठार केल्याचे आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
Protest against Hyderpora encounter
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 6:00 AM
Share

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी सांगितले की, काश्मीर खोऱ्यातील हैदरपोरा येथे झालेल्या चकमकीत ज्या सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला त्याची चौकशी झालीच पाहिजे. गुलाम नबी आझाद म्हणाले की, त्यांच्या काळातही काही निष्पाप लोक मारले गेले ज्यांना दहशतवादी म्हटले गेले होते, मात्र ते तपासात निर्दोष आढळले आणि आज दोषी तुरुंगात आहेत. सुरक्षा दल चांगले काम करत आहे, मात्र सुरक्षा दलांनेही आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असेही ते म्हणाले.

याशिवाय त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली असून आम्ही जम्मू-काश्मीरला राज्य बनवू, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, गुरूवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी हैदरपोरा चकमकीत ठार झालेल्या नागरिकांचे मृतदेह परत मिळावेत या मागणीसाठी आंदोलन केले. याशिवाय, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना बुधवारपासून नजरकैदत ठेवले गेले आहे. चकमकीत निरपराधांना ठार केल्याच्या आरोपांनंतर, मृतांच्या नातेवाईकांनी आयोजित केलेल्या आंदोलनात उपस्थित राहण्यासाठी त्या जात होत्या.

श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या चकमकीवरून वाद निर्माण झाला आहे. ठार झालेले दोन नागरिक हे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचा पोलिसांचा दावा आहे, तर मृतांच्या नातेवाईकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटले. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात नागरिक ठार झाल्याचे पोलिसांनी मान्य केले, तरीही त्याचा मृतदेह नातेवाईकांना देण्याऐवजी हंदवाडा येथे पुरण्यात आले, असा आरोप अब्दुल्ला यांनी केला.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हैदरपोरा चकमकीच्या चौकशीचे आदेश दिले

गुरुवारी, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हैदरपोरा चकमकीच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयाने ट्विट केले आणि लिहिले की हैदरपोरा चकमकीच्या एडीएम दर्जाच्या अधिकाऱ्याने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल समोर येताच सरकार योग्य ती कारवाई करेल. केंद्रशासित प्रदेशातील लोकांना आश्वासन देताना उपराज्यपाल म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर प्रशासन निष्पाप नागरिकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि याची काळजी घेतली जाईल. कोणाकडून कोणाचेही नुकसान होऊ नये, कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, सिन्हा म्हणाले.

पोलीसांचं काय म्हणण?

15 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील हैदरपोरा भागात एका खाजगी इमारतीमध्ये बेकायदेशीर कॉल सेंटरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सांगितले की चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, त्यांची ओळख परदेशी पाकिस्तानी दहशतवादी हैदर आणि त्याचा सहकारी अमीर अहमद अशी आहे. तसेच इमारतीचे मालक अल्ताफ अहमद, भाडेकरू मुदासीर अहमद यांनाही शोध पथकासोबत बोलावण्यात आल्याचे सांगितले. मात्र, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोघांनाही गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, पोलीस म्हणाले.

इतर बातम्या-

Kangana Controversy: कंगनाचा वाद बिहार-झारखंडच्या कोर्टातही पोहोचला, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजनाथ सिंहांनी लेहमध्ये केलं रेझांग ला युद्ध स्मारकाचं उद्घाटन, संरक्षणमंत्र्यांकडून 114 शहीद जवानांना श्रद्धांजली

सुप्रीम कोर्ट म्हणाले, कुठे आहात?; परमबीर सिंग म्हणतात,… तर खड्ड्यातून बाहेर येईल

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.