AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?

पाकिस्तानात भारतीय विमानाला उतरविण्यास परवानगी नाकारल्याने त्यानंतर विमानात अवघे दहा मिनिटांचे इंधन शिल्लक असताना पंजाबातील अमृतसर येथे विमान उतरविण्याची परवानगी देण्यात आली.

Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?
kandhar highjack
| Updated on: Sep 04, 2024 | 10:29 PM
Share

नेटफ्लिक्सवर मल्टी स्टारर IC 814 सिरीज चांगलीच गाजत आहे. साल 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्स फ्लाईट IC 814 चे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मौलाना मसूद अझर सारख्या अतिरेक्यांना सोडून द्यावे लागल्याने भारताची मोठी नामुष्की झाली होती.25 वर्षांपूर्वी घडलेल्या या अपहरणाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. या विमान अपहरणात पंजाबच्या अमृतसर येथे अतिरेक्यांनी विमान थांबवूनही आपल्या लष्करी कमांडोंना कारवाई करता आली नसल्याने या विमान अपहरणात यंत्रणांची नेमकी चूक कुठे झाली यावर चर्चा होत आहे.

24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाईन्स IC 814 फ्लाईट्सचे नेपाळची राजधानी काठमांडूच्या विमानतळावरुन दिल्लीसाठी उड्डाण घेतल्यानंतर 40 मिनिटांनी पाच मास्कधारी अतिरेक्यांनी अपहरण केले होते.या विमानाचे पायलट देवी शरण यांना अतिरेक्यांनी या विमानाला पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये नेण्याचे आदेश दिले होते. परंतू पाकिस्तानातील एअर ट्रॅफीक कंट्रोलरनी विमानाला पाकिस्तानी धावपट्टीवर उतरण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर विमानात विमानात अवघे दहा मिनिटांचे इंधन शिल्लक राहिल्यानंतर पंजाबच्या अमृतसर येथील विमानतळावर अखेर हे अपहृत विमान उतरविण्यात आले होते.

विमानात पुन्हा इंधन भरल्यानंतर हायजॅकरनी विमानाला लाहोरला नेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाकिस्तानी एटीसीने विमानतळाच्या धावपट्टीलवरील सर्व लाईट्स आणि नेव्हीगेशनल सुविधा बंद केल्या. परंतू शेवटच्या मिनिटाला पाकिस्तानात विमानाला लॅण्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि इथेच त्यांनी इंधन भरून विमान दुबईला रवाना करायचे होते. परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी UAE मधील अल मिन्हाद हवाई तळावर विमान उतरविले. तेथे अपहरणकर्त्यांनी 176 प्रवाशांपैकी 27  प्रवाशांना सोडले, त्यात 25 वर्षीय रुपिन कात्याल यांचा मृतदेह होता.

फेक कॉल आला आणि खेळ संपला

अपहरणकर्त्यांनी रुपिन कात्याल यांना विमानात ठार करीत सर्व प्रवाशांची हीच गत करण्याच्या धमक्या देत भारत सरकारकडे तुरुंगातील अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. विमान अमृतसर विमानतळावर असताना केंद्र सरकारचे संयुक्त सचिव जे लाल यांच्या नावाने कोणी तरी फेक कॉल केल्याने विमानाला अमृतसरहून उड्डाण करण्याची आणि भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडण्याची परवानगी  मिळाल्याचे सरकारी सूत्रांनी एका चॅनलशी बोलताना सांगितले.

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.