AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?

पाकिस्तानात भारतीय विमानाला उतरविण्यास परवानगी नाकारल्याने त्यानंतर विमानात अवघे दहा मिनिटांचे इंधन शिल्लक असताना पंजाबातील अमृतसर येथे विमान उतरविण्याची परवानगी देण्यात आली.

Kandahar Hijack : सरकारी अधिकाऱ्याच्या नावाने केलेल्या एका फेक कॉलमुळे सारा प्लान फसला, नेमके काय घडले ?
kandhar highjack
| Updated on: Sep 04, 2024 | 10:29 PM
Share

नेटफ्लिक्सवर मल्टी स्टारर IC 814 सिरीज चांगलीच गाजत आहे. साल 1999 मध्ये इंडियन एअरलाईन्स फ्लाईट IC 814 चे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी मौलाना मसूद अझर सारख्या अतिरेक्यांना सोडून द्यावे लागल्याने भारताची मोठी नामुष्की झाली होती.25 वर्षांपूर्वी घडलेल्या या अपहरणाची कहाणी पुन्हा चर्चेत आली आहे. या विमान अपहरणात पंजाबच्या अमृतसर येथे अतिरेक्यांनी विमान थांबवूनही आपल्या लष्करी कमांडोंना कारवाई करता आली नसल्याने या विमान अपहरणात यंत्रणांची नेमकी चूक कुठे झाली यावर चर्चा होत आहे.

24 डिसेंबर 1999 रोजी इंडियन एअरलाईन्स IC 814 फ्लाईट्सचे नेपाळची राजधानी काठमांडूच्या विमानतळावरुन दिल्लीसाठी उड्डाण घेतल्यानंतर 40 मिनिटांनी पाच मास्कधारी अतिरेक्यांनी अपहरण केले होते.या विमानाचे पायलट देवी शरण यांना अतिरेक्यांनी या विमानाला पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये नेण्याचे आदेश दिले होते. परंतू पाकिस्तानातील एअर ट्रॅफीक कंट्रोलरनी विमानाला पाकिस्तानी धावपट्टीवर उतरण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर विमानात विमानात अवघे दहा मिनिटांचे इंधन शिल्लक राहिल्यानंतर पंजाबच्या अमृतसर येथील विमानतळावर अखेर हे अपहृत विमान उतरविण्यात आले होते.

विमानात पुन्हा इंधन भरल्यानंतर हायजॅकरनी विमानाला लाहोरला नेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पाकिस्तानी एटीसीने विमानतळाच्या धावपट्टीलवरील सर्व लाईट्स आणि नेव्हीगेशनल सुविधा बंद केल्या. परंतू शेवटच्या मिनिटाला पाकिस्तानात विमानाला लॅण्ड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि इथेच त्यांनी इंधन भरून विमान दुबईला रवाना करायचे होते. परवानगी नाकारल्यानंतर, त्यांनी UAE मधील अल मिन्हाद हवाई तळावर विमान उतरविले. तेथे अपहरणकर्त्यांनी 176 प्रवाशांपैकी 27  प्रवाशांना सोडले, त्यात 25 वर्षीय रुपिन कात्याल यांचा मृतदेह होता.

फेक कॉल आला आणि खेळ संपला

अपहरणकर्त्यांनी रुपिन कात्याल यांना विमानात ठार करीत सर्व प्रवाशांची हीच गत करण्याच्या धमक्या देत भारत सरकारकडे तुरुंगातील अतिरेक्यांना सोडण्याची मागणी केली होती. विमान अमृतसर विमानतळावर असताना केंद्र सरकारचे संयुक्त सचिव जे लाल यांच्या नावाने कोणी तरी फेक कॉल केल्याने विमानाला अमृतसरहून उड्डाण करण्याची आणि भारतीय हवाई हद्दीतून बाहेर पडण्याची परवानगी  मिळाल्याचे सरकारी सूत्रांनी एका चॅनलशी बोलताना सांगितले.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता