AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुलगुरुंनी ‘या’तारखेपर्यंत राजीनामा द्यायचाच, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यावरही निशाणा साधला…

राज्यपाल भवनकडून रविवारी यासंदर्भात एक ट्विटही करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 कुलगुरुंना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

कुलगुरुंनी 'या'तारखेपर्यंत राजीनामा द्यायचाच, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यावरही निशाणा साधला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Oct 24, 2022 | 9:06 PM
Share

तिरुअनंतपुरमः केरळमधील राज्यपाल (Governor of Kerala) आणि 9 विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या राजीनाम्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. त्यामुळे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी सोमवारी सकाळपर्यंत राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या 9 विद्यापीठांच्या कुलगुरूंना नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचा खुलासा खुद्द राज्यपालांनीच केला आहे. जे राज्य विद्यापीठांचे कुलगुरू (University Vice-Chancellor) आहेत, त्या सर्व कुलगुरूंनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात स्वतंत्र बैठक घेण्याचीही सध्या जोरदार चर्चा होती.

राज्यपाल भवनकडून रविवारी यासंदर्भात एक ट्विटही करण्यात आले आहे. त्यामध्ये 9 कुलगुरुंना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

ज्यानी राजीनामा देण्यास नकार दिला आहे त्यांना राज्यपालांनी रीतसर नोटीस बजावून सांगण्यात आले आहे. त्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, यूजीसी नियमनातील तरतुदींच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या ‘सर्च कमिटी’च्या शिफारशीनुसार कुलगुरू म्हणून कोणतीही नियुक्ती अवैध ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या नोटिस देण्यात आल्या आहेत.

कुलगुरूंना राजीनामा देण्याच्या प्रकरणावरुन कारणे दाखवा नोटीसच्या तपशीलाबाबतही सवाल करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल म्हणाले की, आता कुलगुरूंना उत्तर देण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील निर्णय काय घेतला जातो याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

या राजीनाम्याबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मात्र राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आपल्यावरील आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्यपाल यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.

याबाबत म्हणाले की, ‘मी फक्त एक चांगला मार्ग सुचवला आहे, त्यामुळे अजूनतरी मी त्यांना बडतर्फ केले नाही.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके