AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौरवशाली इतिहासाची प्रजासत्ताक दिनाला परंपरा, संपूर्ण राष्ट्र साजरे करते सणासारखा उत्सव

जगात ज्या देशाचा उल्लेख लोकशाहीचा देश म्हणून केला जातो, त्या भारतात (India) प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो. यानिनित्त शाळा-कॉलेजात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून हा राष्ट्रीय सन आनंदात साजरा होतो.

गौरवशाली इतिहासाची प्रजासत्ताक दिनाला परंपरा, संपूर्ण राष्ट्र साजरे करते सणासारखा उत्सव
Republic Day
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM
Share

मुंबईः जगात ज्या देशाचा उल्लेख लोकशाहीचा (Democracy) देश म्हणून केला जातो, त्या भारतात (India) प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरा केला जातो. यानिनित्त शाळा-कॉलेजात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करून हा राष्ट्रीय सन आनंदात साजरा होतो. राष्ट्राच्या या उत्सवातील या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. साऱ्या जगात देशाची प्रतिमा प्रजासत्ताक देश म्हणून निर्माण होणे याला अनेक कारणे कारणीभूत आहेत. लोकशाहीचा देश म्हणून ओळख निर्माण केलेल्या या भारतात प्रत्येक गोष्टीला कायद्याची बाजू असते. समाजात वेगवेगळे गट तट निर्माण झाले असले तरी देशातील प्रत्येक घटकाला व्यवस्थेत सामावून घेण्याला संविधानाची खूप मोठी भूमिका असते. देशात श्रीमंत असो की गरीब असो, आमदार असो की, खासदार असो किंवा सामान्य नागरिक असो प्रत्येकाला कायदा समान आहे. त्याला जबाबदार आहे ते म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या संविधानातील या महत्वाच्या गोष्टी ;

प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित

देशात कायद्याच्या आधारावर चालावा म्हणून भारतात 1950 मध्ये संविधान लागू केले गेले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान अवलंबविले तर 26 जानेवारी 1950 या दिवशी लोकशाही प्रणालीबरोबर संविधान लागू केले गेले आहे. 2 वर्षे 11 महिने 18 दिवसानंतर संविधान लागू करून भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले गेले.

लोकशाही प्रणालीने संविधान लागू

भारतात संविधान 1950 मध्ये लागू करण्यात आले होते. देशाला स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनवून देश कायद्यावर चालण्यासाठी 26 रोजी 1949 रोजी भारतीय संविधान सभेने संविधान अंमलात आणले. तर 26 जानेवारी 1950 पासून संविधानाला लोकशाही प्रणालीसह लागू केले गेले. याचाच अर्थ 2 वर्षे 11 महिने 18 दिवसानंतर संविधान लागू करून देशाला पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले.

26 नोव्हेंबर 1949 : संविधानाचा स्वीकार

भारत पूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र बनविण्यासाठी देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आणण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 मध्ये भारतीय संविधान सभेने संविधानाचा स्विकार केला होता. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून लोकशाही तत्व स्वीकारून संविधान लागू केले गेले, म्हणून या साली पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला.

21 तोफांच्या सलामीनंतर ध्वजारोहण

भारतात संविधान लागू झाल्यानंतर हा देश कायदा आणि लोकशाही मानणारा आहे असं चित्र साऱ्या जगभर निर्माण झाले. 26 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीनंतर ध्वजारोहण करून देश प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले.

यावर्षी सुभाषचंद्र बोस जयंतीपासून सुरु होणार प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक भारतात 26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे वैशिष्ट्ये हे आहे की, प्रजासत्ताक दिनाची सुरुवात 23 जानेवारीपासून म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून सुरू होणार आहे. मागील वर्षापासून हा प्रजासत्ताक दिन 24 जानेवारीपासून सुरू होत होता. यावेळी मात्र इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीचे विलिनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारकात करण्यात आले

भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून घोषणा

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 26 जानेवारी 1930 मध्ये देशाला संपूर्ण स्वराज्य घोषित केले होते.यादिवशी भारताचा स्वतंत्र दिवस म्हणून पहिल्यांदा घोषित केला गेला होता. 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत 26 जानेवारीलाच स्वातंत्र्यता दिवस म्हणून साजरा केला जात होता. त्यामुळे या देशाला संपूर्ण स्वराज्य मिळाल्याची तारीख 26 जानेवारी 1930 आहे, त्यामुळे या दिवसाला महत्व प्राप्त करून देण्यासाठी 26 जानेवारा 1950 रोजी या देशाला संविधान लागू करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आले.

राष्ट्रपतींच्या हस्ते होतो ध्वजारोहण

प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीतील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या समारोपाला राष्ट्रपतींना भव्य संचलनाची सलामी दिली जाते.तर राज्याराज्यातून प्रजासत्ताक दिनानिनित्त राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.तसेच स्वातंत्र्यादिनानिमित्त दिल्ली पंतप्रधानांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहण केले जाते आणि राज्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. त्यामुळे अशा विविध घटनांमुळे प्रजासत्ताक दिनाला देशाभरात अनन्यसाधारण महत्व आहे.

संबंधित बातम्या

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राला मिळणार विषेश सेवा मेडल, 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

Air India : प्रजासत्ताक दिनानंतर एअर इंडिया टाटाकडे सोपवली जाणार, 18 हजार कोटी रुपयांत मालकी

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं