AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Cylinder : 75 लाख मोफत गॅस कनेक्शन! मोदी सरकारकडून मोठी भेट

LPG Cylinder : केंद्र सरकारने देशातील 75 लाख महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचा निर्णय घेण्यात आला. या योजनेतंर्गत महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे.

LPG Cylinder : 75 लाख मोफत गॅस कनेक्शन! मोदी सरकारकडून मोठी भेट
LPG Gas Cylinder
| Updated on: Sep 13, 2023 | 5:02 PM
Share

नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली. तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदवार्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षांत गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत या महिलांना लाभ मिळणार आहे.

1,650 कोटींचा तिजोरीवर भार

मंत्रीमंडळाने आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत (Pradhan Mantri Ujjwala Yojana) हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या गॅस कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहेत. 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटींचा बोजा पडणार आहे. निवडणुकीचा हंगाम लवकरच सुरु होत आहे. चार राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. तर पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे ही सरबराई करण्यात येत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

9.60 कोटी गॅस कनेक्शन

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी या घडामोडींची माहिती दिली. त्यानुसार जगभरातील संस्थांनी केंद्रांच्या उज्ज्वला योजनेचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत 75 लाख कनेक्शन देण्यात येणार आहेत.

कोणाला होणार फायदा

देशातील गरीब कुटुंबांना याचा फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारने 9.60 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत. पहिले रिफिल आणि शेगडी पण मोफत देण्यात येते. त्यासाठीचा खर्च ऑईल कंपन्या करतात. कॅबिनेटने यासोबतच ई-कोर्टस प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्याला पण मंजुरी दिली आहे. त्यासाठी 7210 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.

सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी

रक्षाबंधन निमित्त केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर 200 रुपयांची कपात केली होती. या कपातीनंतर गॅस सिलेंडरच्या किंमती दिल्लीत 903 रुपये झाल्या. तर उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी या किंमती 703 रुपये इतक्या झाल्या. येत्या काळात निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता, केंद्र सरकार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात करण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.