AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तरी करू नका; संभाजी छत्रपती यांना कुणाचं खरमरीत पत्र?

मराठी माणसाला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती.

मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तरी करू नका; संभाजी छत्रपती यांना कुणाचं खरमरीत पत्र?
sambhaji chhatrapatiImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 06, 2023 | 2:27 PM
Share

बेळगाव : कर्नाटकातील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दुसऱ्यांदा अनावरण करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी हा सोहळा घडवून आणला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित राहू नये. खासकरून संभाजी छत्रपती यांनी उपस्थित राहू नये, अशी विनंती सीमाभागातील जनतेने केली होती. मात्र, या विनंतीला न जुमानता संभाजी छत्रपती, आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी धीरज देशमुख यांनी या कार्यक्रमात “जय कर्नाटक”चा नारा देत सीमावासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. या दोन्ही मुद्द्यांवरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी संभाजीराजेंना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र जसंच्या तसं

महोदय,

रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला. त्याबद्दल सीमावासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्याकाठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंसगडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली त्या पाठीमागे आणि त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी आंदोलने केली. प्रसंगी कारावासही भोगला.

त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार धीरज देशमुख यांनी “जय कर्नाटक” असे उद्गार काढले. आपण छत्रपतीचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमावासियांच्या आदरास पात्र ठरत आहात.

मराठी माणसाला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही. पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावतील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतीच्या रयतेचा आहे. आपण त्याचे पाईक मानले जाता. तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये, अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली.

आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचारांचे आम्ही वारस आहोत. त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही आमच्या सोबत यावे ही श्री चरणी प्रार्थना कळावे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.