AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या

गुवाहाटीहून मुंबईला येणारं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. शनिवारी संध्याकाळी गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द करण्यात आलं. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं.

गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या
Akasa AirImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 9:46 AM
Share

गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने मुंबईला येणारे शेकडो प्रवासी शनिवारी गुवाहाटी विमानतळावरच अडकून पडले. यावेळी एअरलाइन्सने कोणतीही जबाबदारी न घेतल्याचा आरोप करत संतप्त प्रवाशांनी गुवाहाटी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केलं. गुवाहाटीहून मुंबईला येण्यासाठी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांचं अकासा एअरलाइन्सचं विमान आहे. या विमानाने येण्यासाठी गुवाहाटीला गेलेले मुंबईकर प्रवासी शनिवारी दुपारीच विमानतळावर दाखल झाले. परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

सुरुवातीला हवामान खराब आहे, तसंच इतर तांत्रिक कारणं देत विमान उशिराने असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि अकासा एअरलाइन्सने त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती दिली. पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे आता उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त करताच आजची रात्र तुमची हॉटेलमध्ये सोय करतो आणि उद्या सकाळच्या विमानाने तुम्हाला मुंबईला पाठवलं जाईल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र यावरही अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट विमानतळातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यावर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने प्रवाशांची समजूत काढत त्यांना सकाळच्या विमानाने जाण्याची विनंती केली आणि सकाळी साडेआठ वाजताच्या विमानाने हे प्रवासी अखेर मुंबईला रवाना झाले.

गेल्या काही दिवसांत विमानप्रवासाबद्दलच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाणाच्या अवघ्या काही तासांतच कोसळलं होतं. या दुर्घटनेत विमानातील फक्त एक प्रवासी सोडता बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानप्रवासाबद्दल इतरही काही तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी उड्डाणं अचानक रद्द करण्यात आली. अशातच आता अकासा एअरच्या या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात संताप निर्माण झाला. उड्डाण रद्द झाल्याची माहिती ठराविक वेळेआधी न दिल्याने आणि ऐनवेळी प्रवाशांची गैरसोय झाल्याने अनेकांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं. त्यानंतर अकासा एअरकडून प्रवाशांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत