AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर घणाघाती टीका केली.(Narendra Tomar Congress )

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय
नरेंद्र सिंह तोमर (फाईल फोटो)
| Updated on: Feb 05, 2021 | 3:26 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवरुन काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तोमर यांनी यावेळी भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. भारतात शेतकरी पाण्याचा वापर करुन शेती करतात. मात्र, काँग्रेसचं असा पक्ष आहे ज्याला फक्त रक्ताद्वारे शेती करायची आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. (Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

नरेंद्रसिंह तोमर काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत. त्यांनी कायद्यांमध्ये काय काळं आहे, हे सांगणार की नाही, असा सवाल केला. नवीन कृषी कायद्यांद्वारे शेतकरी त्यांचा शेतमाल देशातील कोणत्याही शहरात विकू शकतात. जर बाजारसमितीच्या बाहेर व्यापार झाला तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही, असं तोमर म्हणाले.

राज्य सरकारचा कर रद्द

नरेंद्रसिंह तोमर यांनी नवीन कृषी कायद्यामुळे राज्य सरकारनं लावेलेल कर रद्द होतात. मात्र, राज्य सरकारचा कायदा कर द्यावा लागेल असं सांगतो. नरेंद्र सिंह तोमर यावेळी बोलताना पुढे म्हणाले की ज्यांच्या कायद्यात कर घेण्याची तरतूद आहे त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. मात्र,इकडे उलटी गंगा वाहत आहे. पंजाब सरकारच्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्यांन चूक केली तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, केंद्राच्या कायद्यामध्ये ही तरतूद नाही.

काँग्रेसला रक्तानं शेती करायचीय

नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही शेतकऱ्याशी 12 वेळा चर्चा केली. त्यांच्या विरोधात काहीही बोललो नाही. तुम्हाला बदल पाहिजे असेल तर बदल सांगण्याची विंनती केली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायद्यात बदल करत असेल तर कायदे चुकीचे आहेत, असं होत नाही. फक्त एका राज्याच्या शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात भडकवलं जात आहे. शेतकऱ्यांना घाबरवलं जात आहे. शेती करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, काँग्रेसला रक्ताची शेती करायची आहे, असा आरोप तोमर यांनी केला. शेती क्षेत्रात केंद्र सरकारनं काम केल आहे. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवल्याचं तोमर म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

(Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.