AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसवर घणाघाती टीका केली.(Narendra Tomar Congress )

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय
नरेंद्र सिंह तोमर (फाईल फोटो)
| Updated on: Feb 05, 2021 | 3:26 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत कृषी कायद्यांवरुन काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तोमर यांनी यावेळी भारत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं सांगितलं. भारतात शेतकरी पाण्याचा वापर करुन शेती करतात. मात्र, काँग्रेसचं असा पक्ष आहे ज्याला फक्त रक्ताद्वारे शेती करायची आहे, अशी घणाघाती टीका नरेंद्र सिंह तोमर यांनी केली. (Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

नरेंद्रसिंह तोमर काय म्हणाले?

शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्रसिंह तोमर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला केला. विरोधी पक्ष कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत आहेत. त्यांनी कायद्यांमध्ये काय काळं आहे, हे सांगणार की नाही, असा सवाल केला. नवीन कृषी कायद्यांद्वारे शेतकरी त्यांचा शेतमाल देशातील कोणत्याही शहरात विकू शकतात. जर बाजारसमितीच्या बाहेर व्यापार झाला तर त्यावर कोणताही कर लावला जाणार नाही, असं तोमर म्हणाले.

राज्य सरकारचा कर रद्द

नरेंद्रसिंह तोमर यांनी नवीन कृषी कायद्यामुळे राज्य सरकारनं लावेलेल कर रद्द होतात. मात्र, राज्य सरकारचा कायदा कर द्यावा लागेल असं सांगतो. नरेंद्र सिंह तोमर यावेळी बोलताना पुढे म्हणाले की ज्यांच्या कायद्यात कर घेण्याची तरतूद आहे त्यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे. मात्र,इकडे उलटी गंगा वाहत आहे. पंजाब सरकारच्या कायद्यानुसार एखाद्या शेतकऱ्यांन चूक केली तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे. मात्र, केंद्राच्या कायद्यामध्ये ही तरतूद नाही.

काँग्रेसला रक्तानं शेती करायचीय

नरेंद्रसिंह तोमर यावेळी बोलताना म्हणाले की आम्ही शेतकऱ्याशी 12 वेळा चर्चा केली. त्यांच्या विरोधात काहीही बोललो नाही. तुम्हाला बदल पाहिजे असेल तर बदल सांगण्याची विंनती केली. मात्र, केंद्र सरकार कृषी कायद्यात बदल करत असेल तर कायदे चुकीचे आहेत, असं होत नाही. फक्त एका राज्याच्या शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात भडकवलं जात आहे. शेतकऱ्यांना घाबरवलं जात आहे. शेती करण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. मात्र, काँग्रेसला रक्ताची शेती करायची आहे, असा आरोप तोमर यांनी केला. शेती क्षेत्रात केंद्र सरकारनं काम केल आहे. आतापर्यंत 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवल्याचं तोमर म्हणाले.

संबंधित बातम्या:

‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

शेतकरी आंदोलनाला रिहाना ते ग्रेटाच्या पाठिंब्यावर शेतकरी नेते राकेश टिकैत काय म्हणाले?

(Narendra Singh Tomar slam Congress over Farmer Protest and Farm laws)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.