AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही; आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं अजब कारण

कोरोना पळून गेला आहे, तोंडाला मास्क लावण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची बेताल बडबड सुरूच आहे. (No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)

प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही; आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलं अजब कारण
Himanta Biswa Sarma
| Updated on: Apr 18, 2021 | 11:38 AM
Share

दिसपूर: कोरोना पळून गेला आहे, तोंडाला मास्क लावण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची बेताल बडबड सुरूच आहे. आता त्यांनी चक्क निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोनाच्या संसर्गचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)

आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, एका संशोधनानुसार ज्या ज्या ठिकाणी प्रचार रॅली झाली होती, तिथे कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच सर्वच उमेदवारांना कोरोनाची लागणही झाली नाही. त्यामुळे आसाममधील निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही हे सिद्ध होतं, असा अजब दावा सरम यांनी केला आहे.

काय म्हणाले सरमा?

आसामसह पाच राज्यात निवडणूका झाल्या. आसाममध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान झालं. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी 4 एप्रिलपर्यंत प्रचार केला होता. राज्यात फेब्रुवारीमध्ये 396 कोरोना रुग्ण सापडले होते. मार्चमध्ये ही संख्या 875 आणि 16 एप्रिलपर्यंत 4528 वर गेली आहे. आम्ही निवडणूक रॅलीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत नाही ना? याचं संशोधन सुरू केलं. मात्र, रॅली झालेल्या ठिकाणी एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचं दिसून आलं. माझ्या मतदारसंघात सुवालकुची येथे 4 एप्रिल रोजी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणीही एकही रुग्ण आढळला नाही, असं सरमा यांनी सांगितलं.

बाहेरून आलेल्यांमुळे कोरोना

यावेळी सरमा यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावला असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटी, डिब्रुगड, जोरहाट, तिनसुकिया आदी शहरांमध्ये, तसेच औद्योगिक ठिकाणी आणि रेल्वे स्थानके आणि विमानतळ असलेल्या भागात कोरोनाची संख्या अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

इतर राज्यांचे प्रमाणपत्र नामंजूर

यावेळी सरमा यांनी महत्त्वाची माहिती दिली. इतर राज्यातून येताना लोक कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन येत आहेत. मात्र इतर राज्यांतून आणलेले हे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट स्वीकारले जाणार नाहीत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकात प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे, असंही ते म्हणाले. (No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)

संबंधित बातम्या:

‘कोरोना संपलाय, मास्क लावण्याची गरज नाही; मास्क लावले तर ब्युटीपार्लर्स कशी चालणार?’

रायपूरमध्ये हॉस्पिटलला आग, 5 जण दगावले, चौघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

पंतप्रधानांनी महत्त्वाची बैठक बोलावली, रात्री 8 वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद

(No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.